शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

भाजपा, मित्रपक्षांची १८ राज्यांत सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.सन १९९३ नंतर तब्बल २४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.सन १९९३ नंतर तब्बल २४ वर्षांनी राजकीय इतिहासाची उलट्या पद्धतीने पुनरावृत्ती झाली. १९९३ मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे अशाच प्रकारे देशातील १८ राज्यांची सत्ता आली होती. अर्थात यात सत्ता असलेल्या राज्यांचा १८ हा आकडा सारखा असला तरी गेल्या दोन दशकात देशात प्रामुख्याने आघाडी आणि युतीची सरकारे आल्याने याची राजकीय समिकरणे मात्र बदलली आहेत. आज केंद्रातील ‘राओला’आघाडीसह विविध राज्यांमधील सत्तांमध्ये मिळून भजपासोबत एकूण ४३ लहान-मोठे पक्ष आहेत. भाजपाची स्वत:ची अथवा मित्रपक्षांच्या आघाडीची उत्तराखंड, हरियाणा, यूपी, राजस्थान, मध्य ्परदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, आसाम, जम्मू-काश्मीर, सिक्किम, बिहार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा व नागालँड या राज्यांमध्ये सरकारे आहेत.लोकसभेतील ६६ टक्के खासदार निवडून देणारी राज्ये१काँग्रेसकडे सत्ता असलेली १९९३ मधील १८ राज्ये आणि भाजपा व मित्रपक्षांकडे सत्ता असलेली आताची १८ राज्ये यात दोन बाबतीत मोठा फरक आहे. आता भाजपा आणि मित्रपक्षांकडे असलेली राज्ये मोठी व हिंदी पट्ट्यातील आहेत. लोकसभेतील ६६ टक्के सदस्य निवडून देणारी ही राज्ये आहेत. काँग्रेसकडे जी १८ राज्ये होती ती तुलनेने लहान होती व लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर तेथून फक्त ४८ सदस्य निवडून जायचे.२आणखी एक फरक असा की, काँग्रेसकडे १९९३ मध्ये असलेल्या १८ राज्यांमध्ये भारताच्या सन १९९१च्या जनगणनेनुसार ४५ टक्के लोकसंख्या राहात होती. आता सन २०११ च्या शिरगणतीनुसार ६८ टक्के लोक भाजपा व मित्रपक्षांची सत्ता असलेल्या १८ राज्यांमध्ये आहे.