शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, मित्रपक्षांची १८ राज्यांत सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.सन १९९३ नंतर तब्बल २४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.सन १९९३ नंतर तब्बल २४ वर्षांनी राजकीय इतिहासाची उलट्या पद्धतीने पुनरावृत्ती झाली. १९९३ मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे अशाच प्रकारे देशातील १८ राज्यांची सत्ता आली होती. अर्थात यात सत्ता असलेल्या राज्यांचा १८ हा आकडा सारखा असला तरी गेल्या दोन दशकात देशात प्रामुख्याने आघाडी आणि युतीची सरकारे आल्याने याची राजकीय समिकरणे मात्र बदलली आहेत. आज केंद्रातील ‘राओला’आघाडीसह विविध राज्यांमधील सत्तांमध्ये मिळून भजपासोबत एकूण ४३ लहान-मोठे पक्ष आहेत. भाजपाची स्वत:ची अथवा मित्रपक्षांच्या आघाडीची उत्तराखंड, हरियाणा, यूपी, राजस्थान, मध्य ्परदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, आसाम, जम्मू-काश्मीर, सिक्किम, बिहार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा व नागालँड या राज्यांमध्ये सरकारे आहेत.लोकसभेतील ६६ टक्के खासदार निवडून देणारी राज्ये१काँग्रेसकडे सत्ता असलेली १९९३ मधील १८ राज्ये आणि भाजपा व मित्रपक्षांकडे सत्ता असलेली आताची १८ राज्ये यात दोन बाबतीत मोठा फरक आहे. आता भाजपा आणि मित्रपक्षांकडे असलेली राज्ये मोठी व हिंदी पट्ट्यातील आहेत. लोकसभेतील ६६ टक्के सदस्य निवडून देणारी ही राज्ये आहेत. काँग्रेसकडे जी १८ राज्ये होती ती तुलनेने लहान होती व लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर तेथून फक्त ४८ सदस्य निवडून जायचे.२आणखी एक फरक असा की, काँग्रेसकडे १९९३ मध्ये असलेल्या १८ राज्यांमध्ये भारताच्या सन १९९१च्या जनगणनेनुसार ४५ टक्के लोकसंख्या राहात होती. आता सन २०११ च्या शिरगणतीनुसार ६८ टक्के लोक भाजपा व मित्रपक्षांची सत्ता असलेल्या १८ राज्यांमध्ये आहे.