शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पक्ष्यांचा संवाद तुटतोय!...1

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

गाड्यांचे हॉर्न, माणसांचा गोंगाट उठलाय जीवावर
पूर्वी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट हमखास ऐकायला यायचा. त्यात पक्ष्यांच्या पिल्लांचाही आवाज असायचा. पण अलीकडच्या काळात हा आवाज कमी होत चालला आहे. कमी होण्यापेक्षा त्यांचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. त्याची कारण अनेक असली तरी त्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे ध्वनिप्रदूषण आहे. शहरातील गाड्यांचे हॉर्न, मोठ्याने वाजवले जाणारे स्पीकर, माणसांचा गोंगाट यांमुळे पक्ष्यांच्या पिल्लांचा जीव धोक्यात आला आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे या छोट्या पिल्लांना त्यांच्या पालकांचा आवाज पोहोचत नाही. त्यामुळे पिल्लांना आता खायचं आहे, हे कळत नाही. परिणामी, ते उपाशीच राहतात. तसंच एखाद्या भक्ष्याला बळी पडतात. अन्नासाठी आणि संरक्षणासाठी पूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून असलेल्या आणि उडू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या पिल्लांची काळजी घेण्याची जबाबदारी आता समाजासमोर आली आहे.
पक्षी विसरले आईचा आवाज
पक्षी आपल्या पिल्लांना जसा आदेश देतात, त्या आदेशाचे पालन इवलेसे जीव करतात. पण पक्ष्यांचा हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे या पक्ष्यांचं आयुष्य धोक्यात आलं आहे, हे पक्ष्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. डलहौसी विद्यापीठाने पक्षी आपल्या पिल्लांचं संरक्षण कसं करतात आणि त्यांना कसं भरवतात याचा शोध घेतला घेतला असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.