शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

पक्ष्यांचा संवाद तुटतोय!...1

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

अंगणातून घरात आणि घरातून अगदी माजघरात ऐकायला येणारा चिमण्यांचा चिवचिवाट, प्राजक्ताच्या झाडावरून हळूच डोकावणाऱ्या कोकिळेची मंजूळ साद तुम्ही किती दिवस झालेत नाही ऐकलीत? नाही आठवत ना...? कसं आठवेल, कारण ही सादच मुळात हरवली आहे अन् याचे मुख्य कारण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेले नागपुरातील ध्वनिप्रदूषण. या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आता पक्ष्यांवरही होत असून त्यांचा आपसातील संवादही संपुष्टात येत आहे. त्याची तीव्रताही इतकी की नुकत्याच जन्माला आलेल्या व भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या पिल्लांचा आवाजसुद्धा त्यांच्या आईपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वेळेत अन्न न मिळाल्याने त्यांचा अकाली मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

गाड्यांचे हॉर्न, माणसांचा गोंगाट उठलाय जीवावर
पूर्वी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट हमखास ऐकायला यायचा. त्यात पक्ष्यांच्या पिल्लांचाही आवाज असायचा. पण अलीकडच्या काळात हा आवाज कमी होत चालला आहे. कमी होण्यापेक्षा त्यांचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. त्याची कारण अनेक असली तरी त्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे ध्वनिप्रदूषण आहे. शहरातील गाड्यांचे हॉर्न, मोठ्याने वाजवले जाणारे स्पीकर, माणसांचा गोंगाट यांमुळे पक्ष्यांच्या पिल्लांचा जीव धोक्यात आला आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे या छोट्या पिल्लांना त्यांच्या पालकांचा आवाज पोहोचत नाही. त्यामुळे पिल्लांना आता खायचं आहे, हे कळत नाही. परिणामी, ते उपाशीच राहतात. तसंच एखाद्या भक्ष्याला बळी पडतात. अन्नासाठी आणि संरक्षणासाठी पूर्णपणे आपल्या पालकांवर अवलंबून असलेल्या आणि उडू न शकणाऱ्या पक्ष्यांच्या पिल्लांची काळजी घेण्याची जबाबदारी आता समाजासमोर आली आहे.
पक्षी विसरले आईचा आवाज
पक्षी आपल्या पिल्लांना जसा आदेश देतात, त्या आदेशाचे पालन इवलेसे जीव करतात. पण पक्ष्यांचा हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे या पक्ष्यांचं आयुष्य धोक्यात आलं आहे, हे पक्ष्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. डलहौसी विद्यापीठाने पक्षी आपल्या पिल्लांचं संरक्षण कसं करतात आणि त्यांना कसं भरवतात याचा शोध घेतला घेतला असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला.