शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

२०२१ पर्यंत सर्व रेल्वेत असणार ‘जैव-शौचालय’

By admin | Updated: June 28, 2015 23:17 IST

स्वच्छ भारत मोहिमेत रेल्वेने मोठा हातभार लावण्यासाठी भक्कम पावले उचलली आहेत. २०२१ पर्यंत रेल्वेचे सर्व डबे जैव-शौचालयांनी (बायो- टॉयलेट) जोडली जातील.

नवी दिल्ली : स्वच्छ भारत मोहिमेत रेल्वेने मोठा हातभार लावण्यासाठी भक्कम पावले उचलली आहेत. २०२१ पर्यंत रेल्वेचे सर्व डबे जैव-शौचालयांनी (बायो- टॉयलेट) जोडली जातील. सध्याची १७,३३८ शौचालये टप्प्याटप्प्यात हटविण्यासाठी एक कृती योजना आखण्यात असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नमूद केले. १०,५०० नव्या डब्यांना बायोटॉयलेट जोडण्याचे काम २०१६-१७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. २०१५-१६ या चालू वर्षात १७ हजार नवी बायोटॉयलेटस् बसविली जातील.स्वच्छ भारतमध्ये रेल्वेचे योगदान

> रेल्वेगाड्यांमधील बायोटॉयलेट योजनेस गती.

> वर्षअखेरीस ३६७ कि.मी. लांबीचे लोहमार्ग मानवी विष्ठामुक्त करण्याचे उद्दिष्ट.

> गांधी जयंतीपर्यंत १७४ कि.मी. लांबीच्या मार्गावर बायोटॉयलेट असलेल्या रेल्वे धावणार. प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च करून ६००० प्रवासी रेल्वेडबे बायोटॉयलेटने सज्ज.घाण करणाऱ्यांना महापालिका आकारणार दंड> स्वच्छ भारत मोहिमेला कायदेशीर पाठबळ देण्याचा विचार सरकार करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे अथवा कचरा फेकणे हा गुन्हा ठरवून दंड ठोठावण्याचा अधिकार महापालिकांना देण्यासंबंधी कायद्याचा मसुदा तयार केला जाणार आहे.> स्वयंनियमन अपुरे ठरत असल्यामुळे स्वच्छतेसाठी कायदा आणणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ज्या पद्धतीने चालान केले जाते त्याच धर्तीवर घाण पसरविणाऱ्यांवर जागीच गुन्हा नोंदला जाईल. नियमांचे अतिक्रमण टाळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांना नव्या कायद्यात गुंफण्यात येईल. > घाण पसरविणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी न्यायालयीन मार्ग अवलंबला जाऊ शकतो. एखाद्या भागात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यास संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होत असल्यामुळे त्याला स्थानिक मुद्दा ठरवता येत नाही, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.