शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

बिंद्रा भारताचा ध्वजवाहक

By admin | Updated: June 11, 2016 06:22 IST

सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले.

नवी दिल्ली : आॅलिम्पिक इतिहासातील पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले. आॅलिम्पिकच्या उद्घाटन समारंभामध्ये बिंद्रा तिरंगा उंचावून भारतीय चमूचे नेतृत्त्व करेल. त्याचप्रमाणे बिंद्रा रिओ स्पर्धेत भारतीय संघाचा सदिच्छा दूतही आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) याविषयी स्पष्ट करताना सांगितले की, २००८ साली बीजिंग आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्राची या मानाच्या स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा बिंद्राची पाचवी आॅलिम्पिक स्पर्धा आहे. याआधी २०१२ आॅलिम्पिकवेळी ध्वजवाहक म्हणून स्टार बॉक्सर विजेंदर सिंग, दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस, कुस्तीपटू सुशीलकुमारसह बिंद्राचाही विचार झाला होता. परंतु, दोनवेळा आॅलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशीलकुमारला आयओएने हा सन्मान दिला होता.३३ वर्षीय बिंद्रा आॅलिम्पिकमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णविजेता भारतीय खेळाडू आहे. २००८ साली १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. बिंद्राला मिळालेल्या या सन्मानाबद्दल भारतीय रायफल संघटनेने (एनआरएआय) आनंद व्यक्त केला आहे. एनआरएआयचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘‘बिंद्रा भारताचा एकमेव वैयक्तिक सुवर्ण विजेता खेळाडू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या (आयएसएसएफ) कार्यकारी समितीमध्येही त्याचा समावेश आहे. बिंद्राला ध्वजवाहक म्हणून निवडण्याचा निर्णय चांगला असून आम्ही मनापासून या निर्णयाचे समर्थन करतो.’’ (वृत्तसंस्था)>‘रिओ’नंतर निवृत्तीआगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये उद्घाटन समारंभात भारताचा पथक प्रमुख म्हणून निवड झालेला नेमबाज अभिनव बिंद्रा याने यंदाच्या आॅलिम्पिकनंतर मी माझ्या कारकिर्दीला पूर्णविराम देणार असल्याचे सांगत आपली निवृत्ती घोषित केली. बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेऊन भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या बिंद्राने आपली २० वर्षांची दीर्घ कारकिर्द विशेष राहिली असल्याचेही सांगितले. यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू सहभागी होत आहे. १० जूनपर्यंत भारताच्या एकूण ९६ खेळाडूंनी आॅलिम्पिक पात्रता मिळवली असून २०१२ सालच्या लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चमूमध्ये ८३ खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे अजूनही भारतीय संघात खेळाडूंची वाढ होण्याची शक्यता असून ही संख्या १०० चा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.२० वर्षांपासून सुरु असलेली माझी कारकिर्द ८ आॅगस्टला संपेल, हे विशेष. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचा ध्वजवाहक होणे कोणत्याही खेळाडूसाठी सन्मानाची बाब असते. यासाठी मला योग्य ठरवल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला विश्वास आहे की, जेव्हा आम्ही रिओ आॅलिम्पिक स्टेडियममध्ये संचालन करु तेव्हा सुमारे एक अरबहून अधिक लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल.- अभिनव बिंद्रा