शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

बिंद्रा भारताचा ध्वजवाहक

By admin | Updated: June 11, 2016 06:22 IST

सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले.

नवी दिल्ली : आॅलिम्पिक इतिहासातील पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याला आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय चमूचा ध्वजवाहक म्हणून निवडण्यात आले. आॅलिम्पिकच्या उद्घाटन समारंभामध्ये बिंद्रा तिरंगा उंचावून भारतीय चमूचे नेतृत्त्व करेल. त्याचप्रमाणे बिंद्रा रिओ स्पर्धेत भारतीय संघाचा सदिच्छा दूतही आहे. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) याविषयी स्पष्ट करताना सांगितले की, २००८ साली बीजिंग आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्राची या मानाच्या स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा बिंद्राची पाचवी आॅलिम्पिक स्पर्धा आहे. याआधी २०१२ आॅलिम्पिकवेळी ध्वजवाहक म्हणून स्टार बॉक्सर विजेंदर सिंग, दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस, कुस्तीपटू सुशीलकुमारसह बिंद्राचाही विचार झाला होता. परंतु, दोनवेळा आॅलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सुशीलकुमारला आयओएने हा सन्मान दिला होता.३३ वर्षीय बिंद्रा आॅलिम्पिकमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णविजेता भारतीय खेळाडू आहे. २००८ साली १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णवेध घेताना त्याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. बिंद्राला मिळालेल्या या सन्मानाबद्दल भारतीय रायफल संघटनेने (एनआरएआय) आनंद व्यक्त केला आहे. एनआरएआयचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘‘बिंद्रा भारताचा एकमेव वैयक्तिक सुवर्ण विजेता खेळाडू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या (आयएसएसएफ) कार्यकारी समितीमध्येही त्याचा समावेश आहे. बिंद्राला ध्वजवाहक म्हणून निवडण्याचा निर्णय चांगला असून आम्ही मनापासून या निर्णयाचे समर्थन करतो.’’ (वृत्तसंस्था)>‘रिओ’नंतर निवृत्तीआगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये उद्घाटन समारंभात भारताचा पथक प्रमुख म्हणून निवड झालेला नेमबाज अभिनव बिंद्रा याने यंदाच्या आॅलिम्पिकनंतर मी माझ्या कारकिर्दीला पूर्णविराम देणार असल्याचे सांगत आपली निवृत्ती घोषित केली. बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेऊन भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या बिंद्राने आपली २० वर्षांची दीर्घ कारकिर्द विशेष राहिली असल्याचेही सांगितले. यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू सहभागी होत आहे. १० जूनपर्यंत भारताच्या एकूण ९६ खेळाडूंनी आॅलिम्पिक पात्रता मिळवली असून २०१२ सालच्या लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चमूमध्ये ८३ खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे अजूनही भारतीय संघात खेळाडूंची वाढ होण्याची शक्यता असून ही संख्या १०० चा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.२० वर्षांपासून सुरु असलेली माझी कारकिर्द ८ आॅगस्टला संपेल, हे विशेष. आॅलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचा ध्वजवाहक होणे कोणत्याही खेळाडूसाठी सन्मानाची बाब असते. यासाठी मला योग्य ठरवल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला विश्वास आहे की, जेव्हा आम्ही रिओ आॅलिम्पिक स्टेडियममध्ये संचालन करु तेव्हा सुमारे एक अरबहून अधिक लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल.- अभिनव बिंद्रा