शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

‘विधेयक अडकल्यामुळे ग्रामविकासावर परिणाम’

By admin | Updated: July 16, 2015 04:15 IST

भूसंपादन विधेयक रोखण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासावर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या मार्गातील अडथळा बनू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयक रोखण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासावर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या मार्गातील अडथळा बनू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांना केले आहे.नीती आयोग संचालन परिषदेच्या बैठकीला मार्गदर्शन करताना देशातील गरिबी उच्चाटनासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने प्रयत्त्न करावे लागतील, असेही प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र आणि राज्यांदरम्यान वाढता मोबदला देण्यावरून कुठलेही मतभेद नाहीत असा दावा करून मोदी म्हणाले, भूसंपादन कायद्यात ग्रामीण क्षेत्राचा विकास आणि प्रामुख्याने शाळामहाविद्यालये, रुग्णालये, रस्ते आणि सिंचन प्रकल्पांचाही समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार असून केवळ राजकीय कारणाने याला विरोध होऊ नये. बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंग आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया उपस्थित होते.