शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

न्यायाधीशांविरुद्धच्या चौकशीसाठी विधेयक

By admin | Updated: February 8, 2016 03:26 IST

न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध ‘दुर्वर्तन आणि अकार्यक्षमता’ संबंधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी विद्यमान व्यवस्थेत बदल करणारे नवे विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

नवी दिल्ली : उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध ‘दुर्वर्तन आणि अकार्यक्षमता’ संबंधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी विद्यमान व्यवस्थेत बदल करणारे नवे विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.या आधीच्या संपुआ सरकारने ‘न्यायिक आदर्श आणि जबाबदारी विधेयक’ आणले होते; परंतु २०१४ मध्ये १५ वी लोकसभा विसर्जित झाल्यानंतर हे विधेयक निष्प्रभ ठरले होते. आता काही बदल करून हे विधेयक नव्याने सादर करण्याची नरेंद्र मोदी यांच्या सरकारची इच्छा आहे. हे विधेयक १२ मार्च २०१२ रोजी लोकसभेत पारित करण्यात आले होते; परंतु न्यायसंस्था आणि कायदेपंडितांनी त्यातील काही तरतुदींना आक्षेप घेतल्यानंतर राज्यसभेने त्यात अनेक दुरुस्त्या केल्या होत्या. त्या निष्प्रभ ठरलेल्या विधेयकात न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींवर विचार करण्यासाठी सर्वंकष यंत्रणा स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. ‘न्यायिक जबाबदारीसाठी राष्ट्रीय न्यायिक निगराणी समिती गठित केली जाऊ शकते, ज्यात न्यायपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरन्यायाधीश, संसदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कायदामंत्री आणि नागरिक समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एखाद्या नामवंत व्यक्तीचा समावेश केला जाऊ शकतो,’ असेही या नोटमध्ये म्हटले आहे.‘न्यायाधीशांच्या मनात स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि जबाबदारी रुजविण्यासाठी एखाद्या अध्यादेशावर तात्काळ विचार करण्यात आला पाहिजे. एक सुधारित न्यायिक आदर्श आणि जबाबदारी विधेयक पुन्हा सादर करून असे केले जाऊ शकते,’ असे विधि मंत्रालयाच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. ‘न्यायिक आदर्श आणि जबाबदारी विधेयक निष्प्रभ झाले आहे आणि आम्ही पुन्हा त्यावर काम करीत आहोत; परंतु कोणताही निर्णय संब्ांंधित पक्षांसोबत विचारविमर्श करूनच घेण्यात येईल,’ असे कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेत सांगितले होते.’