शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद...

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.
लातूर शहरातील आदर्श कॉलनी- रामनगर येथील आपल्या मामाकडे राहणार्‍या विक्रम मुरलीधर पांचाळ (२०) याचा भागिदारीत एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करण्याचा पटेल नगरात व्यवसाय आहे. कच्चा माल आणून तो पक्का करुन बाजारात बल्बची विक्री केली जाते. या व्यवसायात सोनी कुटुंबातील तिघांचा आणि विक्रम पांचाळ अशी चौघांची भागिदारी आहे. भागिदारीतील मालकी हक्कावरुन विक्रम आणि सोनी कुटुंबियांत एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. यातून त्याला मारहाणही करण्यात आली होती. या मारहाणीमुळे घाबरलेल्या विक्रमने पंधरा दिवस दुकानाकडे फिरकलेच नाही. यात विक्रमचे नातेवाईक आणि मामा ओमप्रकाश आलमलेकर यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. शेवटी कच्च्या मालातून तयार झालेल्या वस्तूंच्या विक्रीतून आपले गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणीही त्याच्या नातेवाईकांनी केली होती. शेवटी याच वादातून आपल्या भाचाचे व्यवसायातील भागिदारांनीच अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेनेही पोलिसांचा शोध, तपास सुरु आहे. नरबळीसाठी झालेल्या विक्रमच्या अपहरणाने रविवारी वेगळेच वळण घेतले.
चौघांत व्यवसाय...
शहरातील पटेल नगरात एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करणे, विक्रीचे दुकान-गोदाम आहे. या व्यवसायात चौघांची भागिदारी आहे. विक्रमने दिड लाख तर सोनी कुटुंबियातील तिघांनी चार लाखांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. रॉ मटेरियलचा वापर करुन बल्ब तयार करण्याचे काम येथे केले जाते. याच व्यवसायाच्या वादातून विक्रमचे अपहरण करण्यात आल्याचा संशय विक्रमच्या मामाने व्यक्त केला आहे.
संशयामुळे खळबळ...
लातूर शहरातुन शुक्रवारी भरदिवसा विक्रम पांचाळ या युवकाचा नरबळी देण्यासाठीच अपहरण करण्यात आला असल्याच्या संशयामुळे खळबळ उडाली. आपले अपहरण करण्यात आले असून, पाउस पडावा यासाठी आपला नरबळी देण्यात येणार असल्याचा मॅसेस विक्रमने आपल्या मामाच्या मोबाईलवर टाकला. परिणामी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांची शोध मोहिम...
प्रसाद सगरने आपले अपहरण केले असल्याचा मॅसेज विक्रम पांचाळने आपल्या मामाच्या मोबाईलवर पाठविल्यानंतर, रविवारी प्रसाद सगर आणि व्यावसायीक भागिदार असलेल्या सोनी कुटुंबांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र प्रसाद सगर आणि विक्रम पांचाळची साधी ओळखही नसल्याची मोहिती लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली. परिणामी विक्रमचे अपहरण नेमके कोणी केले, याचे गुढ मात्र वाढले आहे.