शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद...

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती.
लातूर शहरातील आदर्श कॉलनी- रामनगर येथील आपल्या मामाकडे राहणार्‍या विक्रम मुरलीधर पांचाळ (२०) याचा भागिदारीत एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करण्याचा पटेल नगरात व्यवसाय आहे. कच्चा माल आणून तो पक्का करुन बाजारात बल्बची विक्री केली जाते. या व्यवसायात सोनी कुटुंबातील तिघांचा आणि विक्रम पांचाळ अशी चौघांची भागिदारी आहे. भागिदारीतील मालकी हक्कावरुन विक्रम आणि सोनी कुटुंबियांत एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. यातून त्याला मारहाणही करण्यात आली होती. या मारहाणीमुळे घाबरलेल्या विक्रमने पंधरा दिवस दुकानाकडे फिरकलेच नाही. यात विक्रमचे नातेवाईक आणि मामा ओमप्रकाश आलमलेकर यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. शेवटी कच्च्या मालातून तयार झालेल्या वस्तूंच्या विक्रीतून आपले गुंतविलेले पैसे परत देण्याची मागणीही त्याच्या नातेवाईकांनी केली होती. शेवटी याच वादातून आपल्या भाचाचे व्यवसायातील भागिदारांनीच अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेनेही पोलिसांचा शोध, तपास सुरु आहे. नरबळीसाठी झालेल्या विक्रमच्या अपहरणाने रविवारी वेगळेच वळण घेतले.
चौघांत व्यवसाय...
शहरातील पटेल नगरात एलईडी आणि सीएफएल बल्ब तयार करणे, विक्रीचे दुकान-गोदाम आहे. या व्यवसायात चौघांची भागिदारी आहे. विक्रमने दिड लाख तर सोनी कुटुंबियातील तिघांनी चार लाखांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. रॉ मटेरियलचा वापर करुन बल्ब तयार करण्याचे काम येथे केले जाते. याच व्यवसायाच्या वादातून विक्रमचे अपहरण करण्यात आल्याचा संशय विक्रमच्या मामाने व्यक्त केला आहे.
संशयामुळे खळबळ...
लातूर शहरातुन शुक्रवारी भरदिवसा विक्रम पांचाळ या युवकाचा नरबळी देण्यासाठीच अपहरण करण्यात आला असल्याच्या संशयामुळे खळबळ उडाली. आपले अपहरण करण्यात आले असून, पाउस पडावा यासाठी आपला नरबळी देण्यात येणार असल्याचा मॅसेस विक्रमने आपल्या मामाच्या मोबाईलवर टाकला. परिणामी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांची शोध मोहिम...
प्रसाद सगरने आपले अपहरण केले असल्याचा मॅसेज विक्रम पांचाळने आपल्या मामाच्या मोबाईलवर पाठविल्यानंतर, रविवारी प्रसाद सगर आणि व्यावसायीक भागिदार असलेल्या सोनी कुटुंबांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र प्रसाद सगर आणि विक्रम पांचाळची साधी ओळखही नसल्याची मोहिती लातूर ग्रामीण पोलिसांनी दिली. परिणामी विक्रमचे अपहरण नेमके कोणी केले, याचे गुढ मात्र वाढले आहे.