शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बिहारचा बिगुल दिवाळीपूर्वी वाजणार

By admin | Updated: May 18, 2015 02:57 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी एकजूट जनता परिवार सज्ज झाला असताना येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी एकजूट जनता परिवार सज्ज झाला असताना येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात २४३ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. तथापि ही निवडणूक किती टप्प्यात होईल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे.निवडणुकीदरम्यान धन व शक्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केली जाणार आहे. दलांचा पुरेसा फौजफाटा उपलब्ध झाल्यानंतर सप्टेंबर ते आॅक्टोबरमध्ये कुठल्याही क्षणी बिहार निवडणूक होऊ शकते, असे जैदी म्हणाले.३१ जुलैपर्यंत मतदार याद्या तयार होतील. यानंतर मान्सूनची स्थिती, पूर, सणवार, परीक्षा, सुट्या आदींचा विचार करून निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक तयार केले जाईल. पैशाचा गैरवापर ही बिहारातील मोठी समस्या आहे. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोग आधीपेक्षा अधिक सतर्क असेल. कायदा मंत्रालयाकडून काही कायदेशीर तरतुदी यायच्या आहेत. मात्र, आमच्याकडे असलेल्या अधिकारांतर्गत निवडणूक खर्चावर अंकुश ठेवण्याचे काम आयोग चोख बजावेल, असेही ते म्हणाले.मतांसाठी पैसे, भेटवस्तू व मद्य वाटप करण्याऱ्या आणि ‘चॅनल’ रूपात काम करणाऱ्या व्यक्तीकडे आमचे विशेष लक्ष असेल. यादृष्टीने नियोजन अद्यापही सुरूआहे. निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणारी नवी प्रणाली आम्ही लवकरच जारी करू, असेही त्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)