शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

मोदींच्या २० रॅलींनी बिहार ढवळून निघणार

By admin | Updated: September 28, 2015 02:00 IST

बिहारमध्ये जेडीयू- राजद- काँग्रेस महायुतीच्या तगड्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील रालोआने ५०० हून जास्त रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : बिहारमध्ये जेडीयू- राजद- काँग्रेस महायुतीच्या तगड्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वातील रालोआने ५०० हून जास्त रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला. एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० ते २२ मोठ्या जाहीरसभा होणार आहेत.मोदी अनुभवी स्टार प्रचारक असून रालोआचा चेहराही बनले आहेत, कारण मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचेही नाव समोर करण्यात आलेले नाही. या राज्यातील जय-पराजयाचे श्रेय- अपश्रेयाचे राजकारण मोदींभोवतीच केंद्रित असणार आहे. आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्याहून २९ सप्टेंबर रोजी मायदेशी परतल्यानंतर दोनच दिवसात मोदी बिहार ढवळून काढायला जातील. मोदींनी याआधीच बिहारमध्ये चार प्रचारसभांना संबोधित केले आहेत. विदेश दौऱ्याहून परतताच २ आॅक्टोबर रोजी ते बांका येथे तर ४ आॅक्टोबर रोजी लखीसराय येथे प्रचारसभा घेतील. या दोन्ही मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १२ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. लोजपा, रालोसपा, हम या पक्षांचे नेते त्यांच्यासोबत राहतील. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळूनही बांकामध्ये विजय मिळविता आला नव्हता. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात विजयासाठी नवा आधार शोधावा लागेल. (वृत्तसंस्था)