शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बिहारमध्ये ४५ लाचखोर पोलीस सस्पेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:08 IST

बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील ४५ तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे.

पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील ४५ तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. छठ पूजेच्या काळात गंगा नदीवरील महात्मा गांधी पुलावरून अवजड वाहनांच्या चालकांकडून लाच घेऊ न त्यांना जाऊ दिल्याने ही कारवाई करण्यात आली.निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहा पोलीस निरीक्षक, सात विशेष पोलीस निरीक्षक आणि ३२ पोलीस शिपायांचा समावेश आहे.बिहारमध्ये छठपूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यावेळी हजारो लोक गंगा नदीवर जात असतात. त्यावेळी ते महात्मा गांधी पुलाचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात. त्यामुळे या काळात अपघात टाळण्यासाठी महात्मा गांधी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या वाहनांना जाण्याची परवानगीदिली. त्या बदल्यात ते वाहनचालकांकडून लाच घेत होते, असे आढळून आले. त्यामुळे या पुलावर वाहुतकीची प्रचंड कोंडी झाली आणि भाविकांना खूप त्रास झाला.लाचेतून जी रक्कम जमा झाली, तिच्या आपापसात वाटप करण्यावरून नंतर पोलिसांमध्ये मारामारी झाली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी ही चौकशी केली. पोलीस वाहनचालकांकडून लाच घेत असल्याचे आणि नंतर त्यांच्यात मारामारी झाली.>बडतर्फीची कुºहाड?या लाच प्रकरणानंतर महात्मा गांधी पुलावर नव्या पोलिसांना पाठविण्यात आले आहे. या पुलावरून जाण्यासाठी पोलीस नेहमीच अवजड वाहनचालकांकडून पैसे घेतात, असा आरोप आहे. यातून दरमहा लाखो रुपये जमा होतात, अशी चर्चा आहे.निलंबित करण्यात आलेल्या सर्व पोलिसांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यानंतर कदाचित त्यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यता आहे.