शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बिहारमध्ये पोलीस भरतीत एक हजार ‘तोतयां’ना अटक

By admin | Updated: March 30, 2015 02:02 IST

अलीकडेच झालेल्या शालांत परीक्षेत एका परीक्षा केंद्राच्या इमारतीवर पाच चौथ्या मजल्यापर्यंत बाहेरून चढून शेकडो पालकांनी आपल्या पाल्यांना खिडकीतून ‘कॉप्या’ पुरवून बिहारच्या

पाटणी : अलीकडेच झालेल्या शालांत परीक्षेत एका परीक्षा केंद्राच्या इमारतीवर पाच चौथ्या मजल्यापर्यंत बाहेरून चढून शेकडो पालकांनी आपल्या पाल्यांना खिडकीतून ‘कॉप्या’ पुरवून बिहारच्या शिक्षण व्यवस्थेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली गेली होती. त्यानंतर आता तेथे सुरु असलेल्या पोलीस भरतीतही तोतयेगिरी करणाऱ्या एक हजाराहून अधिक उमेदवारांना अटक करण्यात आल्याने त्या राज्याच्या प्रशासनाची उरलीसुरली विश्वासार्हताही संपुष्टात आली आहे.बिहारमध्ये पोलीस भरतीसाठी गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्यांची शारीरिक चाचणी सध्या घेण्यात येत आहे. यासाठी एकूण ५२ हजार उमेदवार पात्र ठरले असून त्यांना येथील पाटलीपुत्र स्टेडियममध्ये शारीरिक चाचणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलाविले जात आहे.यावेळी समोर आलेला उमेदवार आणि त्याने अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे यांची पडताळणी केली असता असली उमेदवाराच्या नावे तोतयेगिरी करून १,००६ जणांनी लेखी परीक्षा दिल्याचे गेल्या आठवडाभरात निदर्शनास आल्यानंतर या उमेदवारांना अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्याचे पोलीस महासंचालक पी. के. ठाकूर यांनी सांगितले की, परीक्षेच्या अर्जावर लावलेले छायाचित्र बदलून किंवा ते ‘मॉर्फ’ करून, बनावट स्वाक्षऱ्या करून आणि प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे बनावट सादर करून ही तोतयेगिरी करण्यात आल्याचे उघड झाले. उमेदवारांची छाननी करण्याची ही प्रक्रिया नुकतीच सुरु झाली असून शारीरिक क्षमता चाचणीसह ती एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण करून पोलीस शिपायांची भरती करण्याचा आमचा मानस आहे, असे ठाकूर म्हणाले.