शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

बिहारला १.२५ लाख कोटींचे पॅकेज

By admin | Updated: August 19, 2015 08:52 IST

भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी

आरा : भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी तब्बल १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार पाटणा येथे मोंदींच्या स्वागतासाठी हजर होते, पण आरा येथील कार्यक्रमाला ते गेले नाहीत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर त्यांनी नंतर टिष्ट्वटरवरून टीका केली व केंद्राकडे पैसे मागणे ही याचना नसून बिहारचा तो हक्क आहे, असे म्हटले. माजी मुख्यमंत्री व राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही विशेष दर्जाऐवजी केवळ पॅकेजवर बोळवण करण्यात आली आहे व हे पॅकेज म्हणजे निव्वळ ‘चुनावी जुमला’ आहे, अश्ी टिका टिष्ट्वटरवर केली.‘मी बिहारसाठी १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत आहे. परंतु सव्वा लाख कोटी रुपयांचे नवे पॅकेज आणि ४० हजार कोटी रुपये जुने असे एकूण १.६५ लाख कोटी रुपये या राज्याला मिळतील,’ असे मोदी म्हणाले. आरा येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पूर्वीच्या संपुआ सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले, त्यावेळचे मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले. बिहारचा स्वाभिमान गहाण ठेवला. राज्याचा स्वाभिमान सोडून दरबारात गेले. याचना केली. प्रतिष्ठा सोडून काही मागितले. पण दिल्लीतील संपुआ सरकारने केवळ १२ हजार कोटी रुपये दिले. ‘तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी येथे आलो आहे. बिहारसाठी मी १.२५ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करीत आहे. आता बिहारचे भाग्य बदलण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. केवळ विकासानेच राज्याचा फायदा होईल आणि गरिबी दूर होईल,’ असे मोदी यांनी सांगितले.बिहार आता ‘बिमारू’ राहिलेले नाही, हा नितीशकुमार यांचा दावा खोडून काढताना मोदी म्हणाले, असे असेल तर मुख्यमंत्री सदासर्वदा आर्थिक पॅकेजची मागणी का करतात, आपले मुख्यमंत्री खवळले आणि बिहारला बिमारू राज्य म्हणणारे मोदी कोण लागून गेले, असे म्हणाले. बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही असा दावाही त्यांनी केला होता. हे जर खरे असेल तर मला सर्वाधिक आनंद होईल. मी त्याचे स्वागतच करीन. पण मला सांगा, एखादा निरोगी असेल तर तो डॉक्टरकडे जाईल काय, एखाद्याचे पोट भरले असेल तर तो जेवण मागायला जाईल काय, एकीकडे ते म्हणतात की बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही आणि दुसरीकडे कुणाला ना कुणाला काही ना काही मागतच असतात,’ असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)