शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारला १.२५ लाख कोटींचे पॅकेज

By admin | Updated: August 19, 2015 08:52 IST

भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी

आरा : भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी तब्बल १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार पाटणा येथे मोंदींच्या स्वागतासाठी हजर होते, पण आरा येथील कार्यक्रमाला ते गेले नाहीत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर त्यांनी नंतर टिष्ट्वटरवरून टीका केली व केंद्राकडे पैसे मागणे ही याचना नसून बिहारचा तो हक्क आहे, असे म्हटले. माजी मुख्यमंत्री व राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही विशेष दर्जाऐवजी केवळ पॅकेजवर बोळवण करण्यात आली आहे व हे पॅकेज म्हणजे निव्वळ ‘चुनावी जुमला’ आहे, अश्ी टिका टिष्ट्वटरवर केली.‘मी बिहारसाठी १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत आहे. परंतु सव्वा लाख कोटी रुपयांचे नवे पॅकेज आणि ४० हजार कोटी रुपये जुने असे एकूण १.६५ लाख कोटी रुपये या राज्याला मिळतील,’ असे मोदी म्हणाले. आरा येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पूर्वीच्या संपुआ सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले, त्यावेळचे मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले. बिहारचा स्वाभिमान गहाण ठेवला. राज्याचा स्वाभिमान सोडून दरबारात गेले. याचना केली. प्रतिष्ठा सोडून काही मागितले. पण दिल्लीतील संपुआ सरकारने केवळ १२ हजार कोटी रुपये दिले. ‘तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी येथे आलो आहे. बिहारसाठी मी १.२५ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करीत आहे. आता बिहारचे भाग्य बदलण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. केवळ विकासानेच राज्याचा फायदा होईल आणि गरिबी दूर होईल,’ असे मोदी यांनी सांगितले.बिहार आता ‘बिमारू’ राहिलेले नाही, हा नितीशकुमार यांचा दावा खोडून काढताना मोदी म्हणाले, असे असेल तर मुख्यमंत्री सदासर्वदा आर्थिक पॅकेजची मागणी का करतात, आपले मुख्यमंत्री खवळले आणि बिहारला बिमारू राज्य म्हणणारे मोदी कोण लागून गेले, असे म्हणाले. बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही असा दावाही त्यांनी केला होता. हे जर खरे असेल तर मला सर्वाधिक आनंद होईल. मी त्याचे स्वागतच करीन. पण मला सांगा, एखादा निरोगी असेल तर तो डॉक्टरकडे जाईल काय, एखाद्याचे पोट भरले असेल तर तो जेवण मागायला जाईल काय, एकीकडे ते म्हणतात की बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही आणि दुसरीकडे कुणाला ना कुणाला काही ना काही मागतच असतात,’ असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)