शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बिहारला १.२५ लाख कोटींचे पॅकेज

By admin | Updated: August 19, 2015 08:52 IST

भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी

आरा : भाजपा सत्तेवर आली तर बिहार विकासाचे नवे शिखर गाठेल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारसाठी तब्बल १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार पाटणा येथे मोंदींच्या स्वागतासाठी हजर होते, पण आरा येथील कार्यक्रमाला ते गेले नाहीत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर त्यांनी नंतर टिष्ट्वटरवरून टीका केली व केंद्राकडे पैसे मागणे ही याचना नसून बिहारचा तो हक्क आहे, असे म्हटले. माजी मुख्यमंत्री व राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही विशेष दर्जाऐवजी केवळ पॅकेजवर बोळवण करण्यात आली आहे व हे पॅकेज म्हणजे निव्वळ ‘चुनावी जुमला’ आहे, अश्ी टिका टिष्ट्वटरवर केली.‘मी बिहारसाठी १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करीत आहे. परंतु सव्वा लाख कोटी रुपयांचे नवे पॅकेज आणि ४० हजार कोटी रुपये जुने असे एकूण १.६५ लाख कोटी रुपये या राज्याला मिळतील,’ असे मोदी म्हणाले. आरा येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पूर्वीच्या संपुआ सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले, त्यावेळचे मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले. बिहारचा स्वाभिमान गहाण ठेवला. राज्याचा स्वाभिमान सोडून दरबारात गेले. याचना केली. प्रतिष्ठा सोडून काही मागितले. पण दिल्लीतील संपुआ सरकारने केवळ १२ हजार कोटी रुपये दिले. ‘तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी येथे आलो आहे. बिहारसाठी मी १.२५ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करीत आहे. आता बिहारचे भाग्य बदलण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. केवळ विकासानेच राज्याचा फायदा होईल आणि गरिबी दूर होईल,’ असे मोदी यांनी सांगितले.बिहार आता ‘बिमारू’ राहिलेले नाही, हा नितीशकुमार यांचा दावा खोडून काढताना मोदी म्हणाले, असे असेल तर मुख्यमंत्री सदासर्वदा आर्थिक पॅकेजची मागणी का करतात, आपले मुख्यमंत्री खवळले आणि बिहारला बिमारू राज्य म्हणणारे मोदी कोण लागून गेले, असे म्हणाले. बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही असा दावाही त्यांनी केला होता. हे जर खरे असेल तर मला सर्वाधिक आनंद होईल. मी त्याचे स्वागतच करीन. पण मला सांगा, एखादा निरोगी असेल तर तो डॉक्टरकडे जाईल काय, एखाद्याचे पोट भरले असेल तर तो जेवण मागायला जाईल काय, एकीकडे ते म्हणतात की बिहार आता बिमारू राज्य राहिलेले नाही आणि दुसरीकडे कुणाला ना कुणाला काही ना काही मागतच असतात,’ असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)