शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

By admin | Updated: October 31, 2016 07:15 IST

ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले

रायपूर : ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले जाणे ही आपल्या संघटनेच्या ४० वर्षांच्या ‘क्रांतीकारी लढ्या’तील सर्वात मोठी हानी असल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने दिली असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘बंद’ची हाक दिली आहे.स्वत:ला संघटनेचा मध्य क्षेत्राचा अधिकृत प्रवक्ता म्हणविणाऱ्या प्रताप नावाच्या व्यक्तीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, २४ आॅक्टोबरच्या सकाळी ओडिशात आमचे २७ सदस्य मारले गेले. गेली ४० वर्षे पक्षाने हाती घेतलेल्या क्रांतिकारी संघर्षातील ही सर्वात मोठी हानी होती. पक्षाचे आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ व तेलंगणमधील अनेक ज्येष्ठ नेते व सदस्य त्या कारवाईत मारले गेले. आमच्या सदस्यांना सरकारने कपटाने मारले व त्यासाठी शरण आलेल्या माओवाद्यांती मदत घेण्याचा दुनाच हातखंडा वापरला गेला.परंतु सरकारच्या अशा कपटी कारस्थानांनी पक्ष दुबळा न होता आमचा लढा यापुढेही सुरुच राहील, अशी वल्गना करताना या प्रसिद्धी पत्रकात असा आरोप केला गेला की, पोलिसांनी आमच्या ११ जखमी सदस्यांना पकडले व नंतर छळ करून त्यांना ठार केले. मोदी सरकार आणि राज्यांची सरकारे आदिवासी भागांमध्ये आक्रमकतेने खाणकामे हाती घेत आहे. पण अशा पिळवणुकीने लोकांमधील असंतोष वाढीला लागतो, याचा शासकांना विसर पडला असून याची त्यांना मोठी किंमत मोडावी लागेल, अशी धमकीही या पत्रकात देण्यात आली. (वृत्तसंस्था)>म्हणे, दडपशाही वाढलीयाआधीही अनेक वेळा असे मोठे आघात होऊनही आणि हजारो सदस्य गमावूनही आमच्या क्रांतिकारी लढ्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे, असा दावा करून पत्रक म्हणते की, आदिवासींच्या पिळवणुकीच्या विरोधात आमची संघटना नेहमीच उभी राहिली आहे. पण ‘आॅपरेशन ग्रीन हंट’चा तिसरा टप्पा हाती घेऊन केंद्र व राज्य सरकारे आमचा लढा चिरडून टाकू पाहात आहेत. (केंद्रीय गृहमंत्री) राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम व कोरापूटला भेट दिल्यानंतर सरकारी दडपशाही वाढली आहे.