शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांतील सर्वात मोठी हानी

By admin | Updated: October 31, 2016 07:15 IST

ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले

रायपूर : ओडिसाच्या मलकानगिरी जिल्ह्यात २४ आॅक्टोबर रोजी पोलीस दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २८ जण मारले जाणे ही आपल्या संघटनेच्या ४० वर्षांच्या ‘क्रांतीकारी लढ्या’तील सर्वात मोठी हानी असल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेने दिली असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या पाच राज्यांमध्ये येत्या ३ नोव्हेंबर रोजी ‘बंद’ची हाक दिली आहे.स्वत:ला संघटनेचा मध्य क्षेत्राचा अधिकृत प्रवक्ता म्हणविणाऱ्या प्रताप नावाच्या व्यक्तीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, २४ आॅक्टोबरच्या सकाळी ओडिशात आमचे २७ सदस्य मारले गेले. गेली ४० वर्षे पक्षाने हाती घेतलेल्या क्रांतिकारी संघर्षातील ही सर्वात मोठी हानी होती. पक्षाचे आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ व तेलंगणमधील अनेक ज्येष्ठ नेते व सदस्य त्या कारवाईत मारले गेले. आमच्या सदस्यांना सरकारने कपटाने मारले व त्यासाठी शरण आलेल्या माओवाद्यांती मदत घेण्याचा दुनाच हातखंडा वापरला गेला.परंतु सरकारच्या अशा कपटी कारस्थानांनी पक्ष दुबळा न होता आमचा लढा यापुढेही सुरुच राहील, अशी वल्गना करताना या प्रसिद्धी पत्रकात असा आरोप केला गेला की, पोलिसांनी आमच्या ११ जखमी सदस्यांना पकडले व नंतर छळ करून त्यांना ठार केले. मोदी सरकार आणि राज्यांची सरकारे आदिवासी भागांमध्ये आक्रमकतेने खाणकामे हाती घेत आहे. पण अशा पिळवणुकीने लोकांमधील असंतोष वाढीला लागतो, याचा शासकांना विसर पडला असून याची त्यांना मोठी किंमत मोडावी लागेल, अशी धमकीही या पत्रकात देण्यात आली. (वृत्तसंस्था)>म्हणे, दडपशाही वाढलीयाआधीही अनेक वेळा असे मोठे आघात होऊनही आणि हजारो सदस्य गमावूनही आमच्या क्रांतिकारी लढ्याने खूप मोठा पल्ला गाठला आहे, असा दावा करून पत्रक म्हणते की, आदिवासींच्या पिळवणुकीच्या विरोधात आमची संघटना नेहमीच उभी राहिली आहे. पण ‘आॅपरेशन ग्रीन हंट’चा तिसरा टप्पा हाती घेऊन केंद्र व राज्य सरकारे आमचा लढा चिरडून टाकू पाहात आहेत. (केंद्रीय गृहमंत्री) राजनाथ सिंग यांनी विशाखापट्टणम व कोरापूटला भेट दिल्यानंतर सरकारी दडपशाही वाढली आहे.