शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचं मोठ योगदान - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 27, 2015 18:36 IST

देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाने मोठे योगदान दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. संसदेत संविधान चर्चा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, २७ - देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाने मोठे योगदान दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. संसदेत संविधान चर्चा या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. यावेळी त्यांनी संविधानात बदल करण्याविषयी कुणीही विचार करू शकत नाही. तसेच, संविधानात बदल करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अपमानाचं विष पचवलं आणि आपल्याला संविधानाचं अमृत दिलं आहे. त्यामुऴे आपलं संविधान हे सर्व भारतीयांसाठी आत्मसन्मान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील काही भाषणांचे मुद्दे : - 
- 'आयडिया ऑफ इंडिया' जनसेवा ही प्रभुसेवा आहे.  
 - कामगारांसाठी लवकरच बोनस कायदा संसदेत मांडणार असून कामगारांना किमान ७ हजार रुपयांचा बोनस मिळणार
- संविधानात बदल करण्याविषयी कुणी विचारही करू शकत नाही. संविधान बदलने म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे.
 - अधिकारांची चर्चा खूप होते, जबाबदारी आणि कर्तव्यांचे भान ठेवले जात नाही. अधिकारांपेक्षा कर्तव्यांची चर्चा झाली आणि कामाला सुरुवात केल्यास देशाचे भले होईल.
 - वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले कारण त्यावेळी मुख्यमंत्री झालेल्या खासदाराने नियमाचा फायदा घेत मतदान केले होते पण वाजपेयींनी लोकशाही व्यवस्थेचा मान राखला.
 - आपल्याकडे एक वेळ आली, त्यावेळी नेत्यांच्या संख्येत वाढ झाली, तेव्हा कोटा सिस्टम आली. त्यावर आम्ही नियम लावले. यावर आम्ही गर्व करु शकतो.
 - भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.
 - संसदेत एका बाजूला जास्त लोकं असले म्हणून वाटेल ती गोष्ट करता येत नाही, त्यासाठी सगळ्यांचेच सहकार्य हवं आहे .
 - संविधानाच्या चौकटीत राहून सरकारी यंत्रणेने काम केले आणि विरोधकांनीही या चौकटीतच आपला विरोध प्रकट केला तर व्यवस्था आणखी सक्षम होईल पण संविधानाची चौकट मोडल्यास देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होईल.
 - आपलं संविधान स्पष्ट आणि पारदर्शक आहे.
 - संविधान हे भारतीयांसाठी आत्मसन्मान आहे.
 - सरकरावर प्रहार करायचा असेल किंवा विरोध करायचा असले किंवा बचाव करायचा असेल तर त्यासाठी संविधानचीच गरज लागते.
 - बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अवहेलना सहन केली मात्र संविधानात त्यांनी कधीही सूडाची भावना येऊ दिली नाही
 - बाबासाहेब आंबेडकरांनी अपमानाचं विष पचवलं आणि आपल्याला संविधानाचं अमृत दिलं.
- जगात जे १२ धर्म आहेत त्यांचा सन्मान करणारे, १२२ भाषा आणि १६०० पेक्षा जास्त बोलीभाषा असलेल्या विविधतांनी भरलेल्या, आस्तिक-नास्तिक जिथे एकत्र नांदतात अशा भारतासाठी संविधान तयार करणे खूप आव्हानात्मक होते.
 - संविधानाची माहिती पुढच्या पिढ्यांना व्हावी हे आपलं कर्तव्य आहे.
- संविधान बनविताना जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधान सामाजिक दस्ताऐवज होऊ शकलं नसतं.
 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवढा व्यापक विचार केला होता हे आजही कायम जाणवत राहतं.
 - संविधान लोकांपर्यंत नेण्यासाठी स्पर्धा, परीक्षा, कार्यक्रम असे उपक्रम आपल्याला राबवता येतील .
 - देशाला एकसंध ठेवण्यात संविधानाचं मोठ योगदान आहे.
- भारतासारख्या देशाचं संविधान बनविणं म्हणजे फारच कठीण काम आहे, तसेच, हा देश राजे - महाराजांनी नव्हे, तर सामान्य जनतेने उभा केला आहे.
- आम्हाला एवढं चांगलं संविधान मिळालं आहे की, ज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
- हा देश सत्ताधिका-यांनी बनविला नसून देशातील करोडो जनतेने बनविला आहे.
 - या संविधानाचा आपण जितका गौरव करु तितका कमीच आहे.
- २६ नोव्हेंबर हा एक ऐतिहासिक दिवस असून संविधान निर्मिती प्रक्रियेतला हा एक महत्त्वाचा दिवस आहे. 
- आत्तापर्यंत जितके पंतप्रधान झाले त्यांच्या योगदानामुळे हा देश तयार झाला असून यांच्यासोबतच यामध्ये अनेकांचे योगदानही आहे.