भूषण गोखले
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
भूषण गोखले : इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले काय आहे हे आपण पाहत नाही. चौकट भारतीय असणे ही खूप ...
भूषण गोखले
भूषण गोखले : इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले काय आहे हे आपण पाहत नाही. चौकट भारतीय असणे ही खूप मोठी भावना कारगील युध्दाच्या वेळी सा-या देशातून रोख, वस्तुंच्या रुपात मदत येत होती. गोरखपूर येथे असताना एका रेल्वे स्टेशनवर एका भिका-याने माझ्याकडे अडीच हजार रुपये दिले. तिथल्या सा-या भिका-यांनी पैसे एकत्र जमवून सैन्यासाठी, देशासाठी मदत केली ... हा किस्सा सांगताना भूषण गोखले यांच्या भावना अनावर झाल्या. सैन्यात आम्ही सारे भारतीय म्हणून असतो, सगऴ्या धर्मांचे सण साजरे करतो, त्यामुळे भारतीय असणे ही खूप मोठी भावना आहे, असे सांगत गोखले यांनी एकीचे महत्व सांगितले.