शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

बीएचआरकडून लवाद नियुक्तीची प्रक्रिया नवीन सॉफ्टवेअर निर्मिती : ठेवीच्या रकमेसाठी प्राधान्यक्रम

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून कर्जदारांच्या विरोधात खटले चालविण्यासाठी लवादाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या लवादाची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून कर्जदारांच्या विरोधात खटले चालविण्यासाठी लवादाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या लवादाची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकपदी जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी लेखापरीक्षणाच्या कामाला वेग दिला आहे.
नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती
बीएचआर पतसंस्थेतर्फे राज्यभरातील २३२ शाखा ऑन लाईन व्यवहार करण्यात आले होते. अवसायकांनी सर्व शाखांच्या लेखापरीक्षणाला प्राधान्य दिले आहे. बीएचआरतर्फे तयार करण्यात आलेल्या ऑन लाईन सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्याने अवसायकांकडून नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात येणार आहे. जुन्या सॉफ्टवेअरमधून एन्ट्री डिलीट होण्याचा धोका असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लवाद नियुक्तीची प्रक्रिया सुरू
बीएचआर पतसंस्थेत कर्ज घेऊन त्याची परतफेड न करणार्‍या कर्जदारांविरोधात पतसंस्थेतर्फे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात धनादेश अनादरीतचे खटले न्यायालयात सुरु आहेत. बीएचआर पतसंस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा असल्याने या पतसंस्थेवर नियुक्त असलेल्या अवसायकांना लवाद नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. सहकार आयुक्तांच्या मंजुरीनंतर कर्जदारांविरोधात खटले चालविण्यासाठी लवकरच लवादाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाच्या पॅनलवर असलेल्या वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नवी पेठ किंवा मुख्य कार्यालयात लवादाचे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

ठेवीदारांचा प्राधान्यक्रम ठरणार
बीएचआर पतसंस्थेकडून कर्जदारांकडून वसुलीला वेग देण्यात आला आहे. वसूल झालेल्या रकमेतून ठेवीदारांना रकमा वाटप करण्यात येणार आहे. वैद्यकीय उपचारासाठी ठेवीदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सुरुवातीला एकूण ठेवीच्या ३० टक्के रकम देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर वसुली वाढल्यानंतर उर्वरित ७० टक्के ठेवींची रक्कम परत करण्यात येणार आहे.