शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१८ कोटींच्या अपहारानंतर विश्वास झाला डळमळीत बीएचआर : २०१४ मधील वार्षिक सभेत उघड झाला अपहार

By admin | Updated: November 27, 2015 21:33 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच्या अपहाराचा मुद्दा समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि खर्‍या अर्थाने बीएचआरच्या डबघाईला सुरुवात झाली.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत ठेवी आणि भागभांडवलाची रक्कम वाढत असताना मनमानी कारभार सुरू झाला. त्यातूनच मग रोख रकमेची चोरी तसेच अपहाराचे प्रकार वाढू लागले. २०१३/१४ या आर्थिक वर्षात समोर आलेल्या १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांच्या अपहाराचा मुद्दा समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि खर्‍या अर्थाने बीएचआरच्या डबघाईला सुरुवात झाली.
बीएचआर पतसंस्थेचा १९ वा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात सादर करण्यात आलेल्या एकत्रित ताळेबंदमध्ये आर्थिक वर्षातील सर्व व्यवहार नमूद केले आहे.
दोन वर्षात १९ कोटी रुपयांचा अपहार
बीएचआर पतसंस्थेची आर्थिकस्थिती काही वर्षात मजबुत झाली. नियमित कर्जवसुली, ठेवीदारांना जादा मिळणारा व्याजदर यामुळे प्रत्येक वर्षी उलाढालीत वाढ होत होती. प्रत्येक वर्षी होणार्‍या प्रगतीमुळे ठेवीदारांची संख्या वाढतच होती. यासार्‍यात पतसंस्थेतील संचालक मंडळ व कर्मचार्‍यांची मनमानी सुरू झाली. २०१२/१३ या वर्षभरात संस्थेच्या विविध शाखांमध्ये एक कोटी ४६ लाख ६६ हजार २८ रुपयांचा अपहार झाला. अपहार करणार्‍यांविरोधात कारवाई करून त्याला प्रतिबंध बसविणे गरजेचे होते. मात्र दुसर्‍या वर्षी म्हणजे २०१३/१४ या वर्षात अपहाराचा हा आकडा १९ कोटी ४५ लाख चार हजार ८६१ रुपयांपर्यंत पोहचला. शासकीय लेखापरीक्षणानंतर या सर्व अपहाराची नोंद वार्षिक अहवालात करण्यात आली. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही बाब उघड झाल्यानंतर ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
पुणे शाखेतील बेनामी व्यवहारामुळे संशय वाढला
बीएचआर पतसंस्थेच्या पुणे येथील एका शाखेत बेनामी खाते आणि व्यवहाराची बाब सहकार विभागाने केलेल्या चौकशीत उघड झाली. त्यातच वार्षिक अहवालातील १९ कोटींचा अपहार अशा एकामागून गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाच्या घटना समोर येऊ लागल्याने ठेवीदारांसोबतच कर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला. यासार्‍यात बीएचआर पतसंस्थेच्या आर्थिकस्थितीबाबत रोज नवनवीन बातम्या येत असल्याने कर्जदारांनी नियमित भरणा थांबविला तर ठेवीदारांचा पैशांसाठी तगादा सुरू झाला.