शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

‘भारत निर्माण’प्रश्नी फौजदारी होणारच!

By admin | Updated: September 4, 2014 00:06 IST

मिरज तालुक्यातील गैरव्यवहार : कारवाई टाळण्याचा प्रयत्न

मिरज : मिरज तालुक्यातील भारत निर्माण योजनेच्या अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरोधात फौजदारी व मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा घालण्याचा प्रयत्न जि. प. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे. कारवाई टाळण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरही दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाईवर ठाम असल्याने पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांनी कारवाईच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांचे धाबे दणाणले आहेत.मिरज तालुक्यातील टाकळी, बोलवाड, सुभाषनगर, नरवाड, बिसूर, संतोषवाडी व विजयनगर या सात गावांसाठी सात वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेला मंजुरी मिळाली. दीड ते दोन वर्षात ही योजना पूर्ण करणे अपेक्षित असताना, गेली सात ते आठ वर्षे ही योजना रखडलेली आहे. निधी खर्च झाला, मात्र काम पूर्ण नाही. खर्चाच्या हिशेबाचे दफ्तर नाही. काही गावात कामांचा पत्ताच नाही. याची दखल घेऊन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी योजनचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत. कारवाईच्या आदेशामुळे बचावासाठी ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांनी जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ठेकेदार व तांत्रिक सल्लागाराच्या मदतीला धावले आहेत. ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरोधात कारवाई करु नये, यासाठी या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे. कारवाईवर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाम असल्याने पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एकनाथ नागरगोजे यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन, त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कारवाईसंबंधी विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. बचावासाठी ठेकेदार, तांत्रिक सल्लागारासह अध्यक्ष व सचिवांची धावपळ उडाली आहे. (वार्ताहर)सीईओंना अधिकाऱ्यांचे आव्हान!भारत निर्माण योजनेचे काम रखडण्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जि. प.च्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची पाठराखण केल्याने ही कारवाई बारगळली होती. फौजदारी व मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई करण्यात याच अधिकाऱ्यांचा अडसर ठरण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागाराविरोधात फौजदारीची व मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई होणार, की तो नेहमीप्रमाणे फार्स ठरणार, याकडे सात गावांच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.