शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत निर्माण’प्रश्नी फौजदारी होणारच!

By admin | Updated: September 4, 2014 00:06 IST

मिरज तालुक्यातील गैरव्यवहार : कारवाई टाळण्याचा प्रयत्न

मिरज : मिरज तालुक्यातील भारत निर्माण योजनेच्या अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरोधात फौजदारी व मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा घालण्याचा प्रयत्न जि. प. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे. कारवाई टाळण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरही दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाईवर ठाम असल्याने पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांनी कारवाईच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांचे धाबे दणाणले आहेत.मिरज तालुक्यातील टाकळी, बोलवाड, सुभाषनगर, नरवाड, बिसूर, संतोषवाडी व विजयनगर या सात गावांसाठी सात वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेला मंजुरी मिळाली. दीड ते दोन वर्षात ही योजना पूर्ण करणे अपेक्षित असताना, गेली सात ते आठ वर्षे ही योजना रखडलेली आहे. निधी खर्च झाला, मात्र काम पूर्ण नाही. खर्चाच्या हिशेबाचे दफ्तर नाही. काही गावात कामांचा पत्ताच नाही. याची दखल घेऊन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी योजनचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत. कारवाईच्या आदेशामुळे बचावासाठी ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांनी जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ठेकेदार व तांत्रिक सल्लागाराच्या मदतीला धावले आहेत. ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांविरोधात कारवाई करु नये, यासाठी या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे. कारवाईवर मुख्य कार्यकारी अधिकारी ठाम असल्याने पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एकनाथ नागरगोजे यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन, त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. कारवाईसंबंधी विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. बचावासाठी ठेकेदार, तांत्रिक सल्लागारासह अध्यक्ष व सचिवांची धावपळ उडाली आहे. (वार्ताहर)सीईओंना अधिकाऱ्यांचे आव्हान!भारत निर्माण योजनेचे काम रखडण्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जि. प.च्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची पाठराखण केल्याने ही कारवाई बारगळली होती. फौजदारी व मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई करण्यात याच अधिकाऱ्यांचा अडसर ठरण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागाराविरोधात फौजदारीची व मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई होणार, की तो नेहमीप्रमाणे फार्स ठरणार, याकडे सात गावांच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.