शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

भारतातील २९ शहरांना भूकंपाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 05:49 IST

राजधानी दिल्लीसह भारतातील ९ राज्यांच्या राजधानीसह २९ शहरे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, ही शहरे भूकंपीय क्षेत्र चार आणि पाच या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये (गंभीर ते अतिगंभीर) येतात.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह भारतातील ९ राज्यांच्या राजधानीसह २९ शहरे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, ही शहरे भूकंपीय क्षेत्र चार आणि पाच या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये (गंभीर ते अतिगंभीर) येतात. यात दिल्ली, पाटणा, श्रीनगर, कोहिमा, पुडुचेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून, इम्फाळ आणि चंदीगडचा समावेश आहे. या शहरांची एकूण लोकसंख्या ३ कोटींपेक्षा अधिक आहे.भारतीय मानक विभागाने देशातील विविध भागांतील भूकंपप्रवण क्षेत्रात आजवर झालेले भूकंप, भूविवर्तन हालचाली, नुकसानीच्या आधारे दोन ते पाच अशी भूकंपप्रवण क्षेत्रे वर्गीकृत केली आहेत, असे राष्टÑीय भूकंपशास्त्र केंद्राचे संचालक विनित गौहलत यांनी सांगितले.यातील बव्हंशी क्षेत्र हिमालयीन पट्ट्यात असून, हिमालयीन पट्टा हे जगातील भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय क्षेत्र आहे.भूकंपाची तीव्रता किंवा भूकंपाची संवेदनशीलतेच्या दृष्टीने विविध शहरांचे वर्गीकरण करणारे राष्टÑीय भूकंपशास्त्र केंद्र भारतीय हवामानशास्त्र विभागांतर्गत येते. सौम्य ते तीव्र भूकंपाच्या क्षमतेनुसार भूकंपप्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण केले जाते.भूकंपप्रवण क्षेत्र दोन म्हणजे या भागात भूगर्भातील हालचाली कमी प्रमाणात होत आहेत. भूकंपप्रवण क्षेत्र-५ हा भाग सर्वाधिक सक्रिय असतो. क्षेत्र चार आणि पाच भूकंपप्रवण भाग गंभीर ते अतिगंभीर श्रेणीत येतो.भूकंपप्रवण क्षेत्र पाचमध्ये ईशान्येकडील प्रदेश, जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कच्छचे रण (गुजरात), उत्तर बिहार तसेच अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश आहे.भूकंपप्रवण क्षेत्र पाचमध्ये जम्मू- काश्मीर, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्टÑाचा काही भाग येतो. २००१ मध्ये भूजमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपात २० हजारांहून अधिक लोक ठार झाले होते.चंदीगड, अंबाला, अमृतसर, लुधियाना आणि रूरकी भूकंपप्रवण चार आणि पाच या क्षेत्रात येतात. ऊर्ध्व आसाम ते जम्मू- काश्मीरपर्यंत हिमालयीन पर्वतराजी विस्तारलेली आहे. भूकंपदृष्ट्या हिमालयीन पर्वतराजीत भूगर्भीय हालचालींचे प्रमाण अधिक असते. गंगेच्या खोºयातील भारतीय शहरे हिमालयीन पट्ट्यात येत असल्याने याठिकाणी भूगर्भात सारख्या हालचाली होत असतात. पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात ३१ नवीन भूकंप वेधशाळा स्थापन होतील. सध्या भारतात अशा ८४ वेधशाळा आहेत, असे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)