शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील २९ शहरांना भूकंपाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 05:49 IST

राजधानी दिल्लीसह भारतातील ९ राज्यांच्या राजधानीसह २९ शहरे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, ही शहरे भूकंपीय क्षेत्र चार आणि पाच या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये (गंभीर ते अतिगंभीर) येतात.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह भारतातील ९ राज्यांच्या राजधानीसह २९ शहरे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, ही शहरे भूकंपीय क्षेत्र चार आणि पाच या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये (गंभीर ते अतिगंभीर) येतात. यात दिल्ली, पाटणा, श्रीनगर, कोहिमा, पुडुचेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून, इम्फाळ आणि चंदीगडचा समावेश आहे. या शहरांची एकूण लोकसंख्या ३ कोटींपेक्षा अधिक आहे.भारतीय मानक विभागाने देशातील विविध भागांतील भूकंपप्रवण क्षेत्रात आजवर झालेले भूकंप, भूविवर्तन हालचाली, नुकसानीच्या आधारे दोन ते पाच अशी भूकंपप्रवण क्षेत्रे वर्गीकृत केली आहेत, असे राष्टÑीय भूकंपशास्त्र केंद्राचे संचालक विनित गौहलत यांनी सांगितले.यातील बव्हंशी क्षेत्र हिमालयीन पट्ट्यात असून, हिमालयीन पट्टा हे जगातील भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय क्षेत्र आहे.भूकंपाची तीव्रता किंवा भूकंपाची संवेदनशीलतेच्या दृष्टीने विविध शहरांचे वर्गीकरण करणारे राष्टÑीय भूकंपशास्त्र केंद्र भारतीय हवामानशास्त्र विभागांतर्गत येते. सौम्य ते तीव्र भूकंपाच्या क्षमतेनुसार भूकंपप्रवण क्षेत्रांचे वर्गीकरण केले जाते.भूकंपप्रवण क्षेत्र दोन म्हणजे या भागात भूगर्भातील हालचाली कमी प्रमाणात होत आहेत. भूकंपप्रवण क्षेत्र-५ हा भाग सर्वाधिक सक्रिय असतो. क्षेत्र चार आणि पाच भूकंपप्रवण भाग गंभीर ते अतिगंभीर श्रेणीत येतो.भूकंपप्रवण क्षेत्र पाचमध्ये ईशान्येकडील प्रदेश, जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कच्छचे रण (गुजरात), उत्तर बिहार तसेच अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश आहे.भूकंपप्रवण क्षेत्र पाचमध्ये जम्मू- काश्मीर, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्टÑाचा काही भाग येतो. २००१ मध्ये भूजमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपात २० हजारांहून अधिक लोक ठार झाले होते.चंदीगड, अंबाला, अमृतसर, लुधियाना आणि रूरकी भूकंपप्रवण चार आणि पाच या क्षेत्रात येतात. ऊर्ध्व आसाम ते जम्मू- काश्मीरपर्यंत हिमालयीन पर्वतराजी विस्तारलेली आहे. भूकंपदृष्ट्या हिमालयीन पर्वतराजीत भूगर्भीय हालचालींचे प्रमाण अधिक असते. गंगेच्या खोºयातील भारतीय शहरे हिमालयीन पट्ट्यात येत असल्याने याठिकाणी भूगर्भात सारख्या हालचाली होत असतात. पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात ३१ नवीन भूकंप वेधशाळा स्थापन होतील. सध्या भारतात अशा ८४ वेधशाळा आहेत, असे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)