शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

बेटी बचाओ : जाहिरातींवरील खर्चाचा फेरविचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 06:13 IST

संसदीय समितीचा केंद्र सरकारला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेसाठी २०१६ ते २०१९ दरम्यान ४४६.७२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी तब्बल ७८ टक्के निधी केवळ या योजनेच्या जाहिरातींवर खर्च करण्यात आल्याच्या पार्श्वभूमिवर एका संसदीय समितीने सरकारने जाहिरातींवरील खर्चाचा फेरविचार करावा, असे सुचविले आहे.  

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या विशेष संदर्भासह “शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण” या विषयावर केलेल्या कार्यवाहीवरील महिला सक्षमीकरण समितीचा (2021-22) सहावा अहवाल गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यात वरील बाब अधोरेखित करण्यात आली आहे. सरकारने याऐवजी शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील नियोजित खर्चाच्या तरतुदीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे समितीने अहवालात म्हटले आहे.

गेली सहा वर्षे बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या सातत्यपूर्ण प्रचाराद्वारे आपण मुलींची पर्वा करण्याच्या मुद्याकडे राजकीय नेतृत्व व राष्ट्रीय जनमानसाचे लक्ष वेधण्यात यश मिळवले आहे. आता अपेक्षित शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असे त्यात म्हटले आहे. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठका घेण्यात याव्यात, असेही समितीने म्हटले आहे.

काय म्हटले समितीने?प्रत्येक मुलीला शिक्षण मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी तसेच मागास भागातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्याचे नमूद करून सरकारने यापुढे या योजनेच्या जाहिरातींवरील खर्चाचा फेरविचार करून शिक्षण, आरोग्याशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियोजित खर्चाच्या तरतुदीवर लक्ष केंद्रित करावे, असे समितीने म्हटले.