शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘आधार’ नसले तरी योजनांचा लाभ

By admin | Updated: August 12, 2015 05:01 IST

भारतीय राज्यघटनेनुसार ‘प्रायव्हसी’ हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनापीठाकडे वर्ग केला आणि यावर निर्णय होत नाही

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेनुसार ‘प्रायव्हसी’ हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घटनापीठाकडे वर्ग केला आणि यावर निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांवर आधार कार्डची सक्ती करू नये, असा अंतरिम आदेश दिला.सक्तीने ‘आधार’ काढायला लावणे आणि सरकारी योजनांचे लाभ या कार्डाशी निगडित करणे म्हणजे नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’च्या मूलभूत हक्कावर गदा आणणे आहे, या मुद्द्यावर अनेक याचिका केल्या गेल्या. तसेच आधारसाठी संकलित केलेली ‘बायोमेट्रिक’ माहिती फौजदारी गुन्ह्याच्या तपासाच्या कामी पोलिसांना उपलब्ध करून देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध ‘युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’चे अपीलही सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यात केंद्र सरकारने ‘प्रायव्हसी’ हा मूलभूत अधिकार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. या मुद्द्यांवर निकाल देण्यास न्या. जे. चेलमेश्वर, न्या. शरद बोबडे व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या. त्याचा निकाल होईपर्यंत खंडपीठाने आधारसंबंधी अंतरिम आदेश दिले.न्यायालयाने दिलेले अंतरिम आदेश असे...- नागरिकांवर आधार कार्ड काढण्याची सक्ती नाही.- सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे नाही. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनाही हे लाभ मिळतील.- स्वयंपाकाचा गॅस, रेशनवरील धान्य आणि रॉकेल यांचे अनुदान देण्यासाठी या योजनांची आधार कार्डाशी सांगड घालण्याची सरकारला मुभा. मात्र हे वगळता इतर सामाजिक सुरक्षा योजना आधार कार्डाशी जोडता येणार नाहीत.- आधार कार्ड नसले तरी स्वयंपाकाचा गॅस, रेशनवरील धान्य आणि रॉकेलचे अनुदान मिळेल.- आधार कार्ड तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीची घेतलेली वैयक्तिक स्वरूपाची ‘बायोमेट्रिक’ माहिती, आधार यंत्रणेखेरीज अन्य कोणालाही उपलब्ध करून दिली जाणार नाही.- न्यायालयाने आदेश दिला तर मात्र फौजदारी गुन्ह्याच्या तपासासाठी अशी माहिती पोलिसांना उपलब्ध करून देता येईल.