शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना सरकारी योजनेचा लाभ; ‘अशाप्रकारे’ अर्ज करुन घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 09:34 IST

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे अनेक जण नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झालेत. या युवकांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. अटल विमा कल्याण योजनेंतर्गत सवलतीत वाढ करण्याच्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचा कालावधी सरकारने कालावधी ३० जून २०२१ पर्यंत वाढविला आहे. याचा लाभ कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये नोंदणीकृत कामगारांना ५० टक्के बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा ४० लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

या लोकांना योजनेचा लाभ मिळेल

अटल विमा कल्याण योजनेंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे रोजगार गेले आहेत अशांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा फायदा ESI योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांनाच होतो. म्हणजेच ईएसआयचे योगदान त्यांच्या मासिक पगारामधून वजा केले जाते.

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल. हा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ज्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत त्यांना होणार आहे. पूर्वी ही योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आता त्याचा फायदा जून २०२१ पर्यंत घेता येईल.

हे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

जरी एखाद्या व्यक्तीने ईएसआयसीचा विमा उतरविला असेल, परंतु काही गैरव्यवहारामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, त्या व्यक्तीविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेआधी त्या व्यक्तीने सेवानिवृत्ती (VRS) घेतली असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नसेल, त्यांना या योजनेला लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

विमाधारकाने नोकरी सोडण्यापूर्वी किमान २ वर्षे काम केले असावे आणि ईएसआयमध्ये कमीतकमी ७८ दिवस योगदान दिले असावे. नोकरी गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत दावा करावा लागतो. यासाठी क्लेम फॉर्म थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात किंवा ऑनलाईन सादर करता येईल. तसेच आपण ईएसआयसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन अटल विमा कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म मिळवल्यानंतर १५ दिवसांच्या आत क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड नंबरचा वापर केला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी