शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
6
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
7
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
8
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
9
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
10
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
11
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
12
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
13
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
14
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
15
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
16
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
18
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
19
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
20
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले

कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना सरकारी योजनेचा लाभ; ‘अशाप्रकारे’ अर्ज करुन घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 09:34 IST

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे अनेक जण नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झालेत. या युवकांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. अटल विमा कल्याण योजनेंतर्गत सवलतीत वाढ करण्याच्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचा कालावधी सरकारने कालावधी ३० जून २०२१ पर्यंत वाढविला आहे. याचा लाभ कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये नोंदणीकृत कामगारांना ५० टक्के बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा ४० लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

या लोकांना योजनेचा लाभ मिळेल

अटल विमा कल्याण योजनेंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे रोजगार गेले आहेत अशांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा फायदा ESI योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांनाच होतो. म्हणजेच ईएसआयचे योगदान त्यांच्या मासिक पगारामधून वजा केले जाते.

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल. हा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ज्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत त्यांना होणार आहे. पूर्वी ही योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आता त्याचा फायदा जून २०२१ पर्यंत घेता येईल.

हे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

जरी एखाद्या व्यक्तीने ईएसआयसीचा विमा उतरविला असेल, परंतु काही गैरव्यवहारामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, त्या व्यक्तीविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेआधी त्या व्यक्तीने सेवानिवृत्ती (VRS) घेतली असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नसेल, त्यांना या योजनेला लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

विमाधारकाने नोकरी सोडण्यापूर्वी किमान २ वर्षे काम केले असावे आणि ईएसआयमध्ये कमीतकमी ७८ दिवस योगदान दिले असावे. नोकरी गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत दावा करावा लागतो. यासाठी क्लेम फॉर्म थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात किंवा ऑनलाईन सादर करता येईल. तसेच आपण ईएसआयसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन अटल विमा कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म मिळवल्यानंतर १५ दिवसांच्या आत क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड नंबरचा वापर केला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी