शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

ब्रिटिशकाळापासून संतसाहित्याची पीछेहाट

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

सदानंद मोरे : जिल्हा वारकरी समितीतर्फे सत्कारप्रसंगी प्रतिपादन

सदानंद मोरे : जिल्हा वारकरी समितीतर्फे सत्कारप्रसंगी प्रतिपादन
नाशिक : मराठी साहित्याचा पाया असणार्‍या संत साहित्याला ब्रिटिश काळापासून वाईट दिवस आले. तत्पूर्वी ज्ञानदेवांपासून ते निळूबारायांपर्यंत सर्वच संतांनी जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडले होते. ते घराघरात पोहोचले होते, परंतु ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू झाल्याने संतसाहित्याची पीछेहाट झाल्याचे मत ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मीचंद्र शेंडे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, केशव पाटील, त्र्यंबक गायकवाड आदि उपस्थित होते. ते म्हणाले संतसाहित्य मराठी साहित्याचा पाया आहे. वर्तमानकाळाचा अभ्यास करून अध्यात्माद्वारे त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम संतांनी केले. राज्याची संस्कृती व्यापक आहे, तिची जडणघडणही संतांनीच केली. संतांनी त्यांच्या काळात साहित्यातून वर्तमानकाळातील परिस्थितीवर प्रहार केले. संत निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत सर्वांनीच साहित्य घराघरांत पोहोचविले.
१३व्या शतकात स्थापन झालेल्या भागवत धर्माने जाती पाती तोडत नव्या धर्माची स्थापना केली. त्यात अनेक पंथांच्या आणि धर्माच्या लोकांनी त्यात प्रवेश केला. त्यानंतर भेदभावाची तीव्रता कमी झाली होती, संतसाहित्याच्या विचारांची ती क्रांती होती. त्यानंतर पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार झाल्यानंतर संतसाहित्यावर आधारितच लावण्या तयार होऊ लागल्या. तोपर्यंत संतसाहित्य घराघरात होते. परंतु त्यानंतर इंगजांबरोबर आलेल्या त्यांच्या साहित्याचे अनुकरण मराठी साहित्यात होऊ लागल्याने तेव्हापासूनच संतसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.
त्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची आरती, प्रार्थना समाजाची तत्त्वे यांच्यामध्येही संतसाहित्याचाच वारसा दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकावर संतसाहित्याचेच संस्कार होत असतात, असे माझे मत असल्याचेही ते म्हणाले. मी संतसाहित्याबरोबरच आधुनिक साहित्याचाही लेखक आहे. त्यामुळे संतसाहित्यिकाच्या दृष्टीतून आधुनिक पद्धतीचे लिखाण करताना मी दोन्हीकडे समतोल साधतो असेही ते म्हणाले. प्रारंभी दामोदर गावले यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी परिचय करून दिला. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीबुवा कुर्‍हेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विनायकदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

अत्रेंच्या शाबासकीने लिहिता झालो
वयाच्या अकराव्या वर्षी मी तुकोबारायांवर पहिला लेख लिहिला होता. तो छापून यावा, अशी माझी इच्छा होती. त्यानुसार मी तो लेख अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्रात पाठविला होता. अत्रेंनी तो लेख तर छापलाच, परंतु मला शाबासकी देत लिखाण करीत राहा असा सल्ला दिली. त्यामुळेच मी लिहिता झालो, असे मोरे म्हणाले.

माझ्यावर जास्त जबाबदारी
नाशिकमध्ये झालेल्या वारकरी संप्रदायाच्या साहित्य संमेलनामुळेच माझ्यावर आज मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे, असे मी समजतो. वारकरी समाजाचा असल्याने इतर अध्यक्षांपेक्षा माझ्याकडून साहित्यिकांसह वाचकांनाही जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर असल्याचे मी समजतो.