शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करा!

By admin | Updated: March 3, 2017 04:36 IST

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन याचे शिर कलम करणाऱ्यास १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली

इडुक्की : केरळमध्ये डावे पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संघर्ष एवढ्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे की, संघाच्या नेत्याने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन याचे शिर कलम करणाऱ्यास १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. भारतात असा प्रकार घडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. विजयन यांच्या खुनासाठी १ कोटी रुपये देण्याचे भयंकर विधान डॉ. चंद्रावत यांनी उज्जैन येथील कार्यक्रमात केले. खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादव यावेळी उपस्थित होते. विजयन यांचे शिर आणणाऱ्यास बक्षीस देण्यासाठी प्रसंगी आपण आपली मालमत्ता विकू, असेही ते म्हणाले. केरळमध्ये मार्क्सवाद्यांच्या अत्याचाराविरुद्ध आयोजित विशाल धरणे आंदोलनात ते बोलत होते. या भाषणाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते विजयन यांचे शिर कलम करणाऱ्यास बक्षीस देण्याचे विधान करताना दिसतात. विजयन समजतात की हिंदूंच्या रक्तात धमक नाही. मी घोषणा करतो की, जो कोणी त्याचे शिर कलम करील त्याला मी माझे घर आणि संपत्ती देईन. मात्र, अशा द्रोह्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. गोध्राचा उल्लेख करून चंद्रावत म्हणाले की, गोध्रा विसरलात काय? ५६ मारले होते. २,००० गाडले गेले. डाव्यांनो कान देऊन ऐका, तुम्ही ३०० प्रचारक आणि कार्यकर्त्यांची हत्या केली. त्या बदल्यात आम्ही भारतमातेला ३ लाख शिर अर्पण करू. डॉ. चंद्रावत यांच्या या वक्तव्यावरून वाद उफाळताच, ही आमची अधिकृत भूमिका नाही, असे घाईघाईने जाहीर कले आहे.संघासह उजव्या विचारसरणीच्या संघटना गेल्या अनेक वर्षांपासून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघाने मुसोलिनीची संघटनात्मक संरचना आणि हिटलरची विचारसरणी अवलंबिली आहे. या दोन हुकूमशहांनी जगाला घाबरवून सोडले होते, असे विजयन गेल्या आठवड्यात म्हणाले होते. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे आरएसएसच्या हातचे बाहुले होते. षड्यंत्र रचून गांधींची हत्या करण्यात आली, असेही त्यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)>मोदींच्या अपमानावरून बिहार विधानसभेत गोंधळनितीशकुमार सरकारमधील मंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ रालोआ आमदारांनी गुरुवारीही बिहार विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन मस्तान यांच्या हकालपट्टीची मागणी केली तसेच त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. प्रकरण तापत असल्याचे पाहून जलील मस्तान यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली होती. दुसरीकडे बिहार भाजपने जोपर्यंत जलील मस्तान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. नोटाबंदीविरुद्धच्या एका आंदोलनादरम्यान जलील मस्तान यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आवाहन केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.>हीच संघाची मानसिकता : विजयनया धमकीबाबत विजयन म्हणाले की, रा. स्व. संघाची मानसिकता काय आहे, हेच यावरून स्पष्ट होते. संघ परिवाराने या प्रकारे आधीही अनेकांचे शिरच्छेद केल्याचा आरोपही त्यांनी केला.