शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

चारा बचतीसाठी बळीराजा सरसावला

By admin | Updated: April 10, 2015 23:29 IST

वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्‍याी टंचाई लक्षात घेता शेतकर्‍यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्‍याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व मका ही दोनच पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सलग तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहे. अशातच गत महिनाभरापासून गोवंश हत्या बंदी झाल्याने बाजारात विक्रीस येणार्‍या जनावरांची विशेषत: म्हातार्‍या बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अशी जनावरे स्वत:लाच सांभाळावी लागणार असल्याने चारा जमवाजमव करण्यावर बळीराजाने जोर दिला आहे. मक्याचा चारा तसाच जणावरांना टाकल्यास जनावरे चार्‍याचे केवळ पाचट काढून खातात. त्यामुळे मक्याचे ताट तसेच वाया जाते. यामु

वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्‍याी टंचाई लक्षात घेता शेतकर्‍यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्‍याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व मका ही दोनच पिके प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सलग तीन वर्षांपासून परिसरात दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहे. अशातच गत महिनाभरापासून गोवंश हत्या बंदी झाल्याने बाजारात विक्रीस येणार्‍या जनावरांची विशेषत: म्हातार्‍या बैलांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अशी जनावरे स्वत:लाच सांभाळावी लागणार असल्याने चारा जमवाजमव करण्यावर बळीराजाने जोर दिला आहे. मक्याचा चारा तसाच जणावरांना टाकल्यास जनावरे चार्‍याचे केवळ पाचट काढून खातात. त्यामुळे मक्याचे ताट तसेच वाया जाते. यामुळे प्रचंड प्रमाणात चार्‍याची नासाडी होते. त्यामुळे शेतकर्‍यावर लवकर चारा शोधण्याची वेळ येऊन ढेपते. बागायत नसल्याने हिरवा चारा मिळणेही पुरापस्थ आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मक्याच्या चार्‍याचे भुस करून साठवण्यावर भर दिला आहे. चार्‍याचे भुस केल्याने जनावरेही तो व्यवस्थीत खातात शिवाय भुस वाया जात नाही. नसता जणावरे चारा पायाखाली घेऊन तुडवतात. त्यामुळे चार्‍याची नासाडी होते. ट्रॅक्टरवरील यंत्राद्वारे शेतकरी मका चार्‍याची कुट्टी करुन घेत आहे. नंतर कुट्टी केलेला चारा (भुस) एका ठिकाणी साठवून तो पत्र्याखाली झाकून ठेवत असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण होते. यंदा अवकाळी पावसामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी गहू हार्वेस्टर यंत्राने मळणी केल्याने भुस वाया गेले आहे. पावसाळुयात हेच भुस जनावरांच्या खाण्यात उपयोगात येते.