शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता - भाजपा नेता बरळले

By admin | Updated: October 4, 2015 09:34 IST

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत हा भिकारी देश होता असे वादग्रस्त विधान मध्यप्रदेशमधील भाजपा नेते नंदकुमार चौहान यांनी केले आहे.

 

ऑनलाइन लोकमत 
भोपाळ, दि. ४ - नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत हा भिकारी देश होता असे वादग्रस्त विधान मध्यप्रदेशमधील भाजपा नेते नंदकुमार चौहान यांनी केले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून विदेशातील दिग्गज नेते भारताचा आदर करु लागले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. 
मध्यप्रदेशमधील खुरई येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार चौहान यांनी मोदींचे कौतुक करताना मुक्ताफळेच उधळली. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी देश होता. पण मोदी सत्तेवर आल्यापासून भारताची प्रतिमा बदलली आहे असे त्यांनी म्हटले आहे. तर शिवराज सिंह यांनी मध्यप्रदेशमधील साडे सात कोटीहून अधिक लोकांच्या आयुष्यात आनंद पसरवला आहे असे त्यांनी नमूद केले. 
नंदकुमार सिंह यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी शिक्षकांना चणे फुटाणेवाले संबोधित करुन वाद निर्माण केला होता.