शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघटीत व्हावे

By admin | Updated: December 28, 2015 00:05 IST

जळगाव- हा देश हिंदुंचा आहे. जगात इतर धर्मियांचे राष्ट्र आहेत. तशी देशात हिंदुराष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्वार्ंनी तयार राहावे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्र रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आमदार राजासिंह ठाकूर (हैद्राबाद) यांनी रविवारी हिंदु धर्मजागृती सभेत केले.

जळगाव- हा देश हिंदुंचा आहे. जगात इतर धर्मियांचे राष्ट्र आहेत. तशी देशात हिंदुराष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्वार्ंनी तयार राहावे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्र रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आमदार राजासिंह ठाकूर (हैद्राबाद) यांनी रविवारी हिंदु धर्मजागृती सभेत केले.
शहरातील शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सनातन संस्थेचे संत नंदकुमार जाधव, संस्थेच्या प्रसारसेविका स्वाती खाडे, हिंदु जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते.
डॉ.संजीव हुजुरबाजार व आरती हुजुरबाजार, सपन झुनझुनवाला, नीलेश पवार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. समितीच्या कार्याची माहिती प्रतीक्षा कोरेगावकर यांनी दिली.



नेमांडेंचा निषेध का केला नाही?
पुरोगामी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी श्रीकृष्ण हे फक्त चालक होते, व्याधीग्रस्त होते, असे वक्तव्य केले. त्यांचा निषेध का करण्यात आला नाही, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.

आमीर खान, शाहरूख खानना इसिसचे झेंडे दिसत नाही...
जाधव म्हणाले, देशात असहिष्णुता आहे, असे म्हणणारे आमीर व शाहरूख खान यांना जम्मू काश्मिरात इसिसचे झेंडे फडकविले जातात ते दिसत नाही. बंगाल, बांगलादेश, पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार होतात तेदेखील आमीर व शाहरूख यांना दिसत नाही. त्यांच्यामुळेच देशात असहिष्णुता वाढत आहे, असा दावा जाधव यांनी केला.

समीर गायकवाड निर्दोष सुटेल
पानसरेंच्या हत्येसंबंधी अटकेत असलेला समीर गायकवाड तसेच साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत हे निर्दोष सुटतील, असेही जाधव म्हणाले.

मानव खोटारडे
सनातन संस्थेत युवकांना संमोहीत करून त्यांच्याकडून चुकीचे कार्य करवून घेतले जाते, असा आरोप श्याम मानव यांनी केला. मानव यांचा आरोप चुकीचा असून, त्यांना संमोहन शास्त्राची माहितीच नाही. ते खोटारडे आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादीवर बंदी का नको?
पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येनंतर पोलिसांना दोष देण्याऐवजी सनातन संस्थेवर बंंदीची मागणी करण्यात आली. मग एका खूनाच्या प्रकरणात पद्मसिंग पाटील दोषी असल्याचे सिद्ध झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी का आणली नाही. शिखांची कत्तल केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसवर बंदी का आणली नाही, केरळात २०० स्वयंसेवकांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या माकपावर बंदी का नाही, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला.