शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

पक्षीमित्रासोबतच निसर्गमित्र व्हा पक्षीमित्र संमेलनात सूर : रेस्क्यू हाऊसची गरज; खुल्या सत्रा दरम्यान व्यक्त केली भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:12 IST

पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्रस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. पक्षी वाचविण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ पक्षीमित्र राहून चालणार नाही तर निसर्गमित्र व्हावे अशी अपेक्षा संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी आयोजित केलेल्या खुल्या सत्रादरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.सातपुडा बचाव कृती समितीतर्फे वाघूर परिसरात दोन दिवसीय संमेलनात दुपारी १२ वाजता खुले सत्र घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे, संयोजक राजेंद्र नन्नवरे, डॉ.सुधाकर कुर्‍हाडे उपस्थित होते.माकडांचाउपद्रवथांबविण्यासाठीवृक्षतोडदत्तात्रय तावडे यांनी शेती शिवारातील पक्षांची स्थिती याबाबत आपले निरीक्षण नोंदविले. पूर्वी घनदाट जंगल होते. पाणी भरपूर होते. नंतर शेतीचा विकास झाला. विहिरीवर वीजपंप आले. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे नदी व नाले आटले. त्यामुळे पक्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वी बैलाद्वारे शेती केली जात होती. त्यावेळी शेतात बांध होते. या बांधावर भरपूर झाडे असल्याने पक्ष्यांचा निवारा त्यावर होता. कालांतराने यांत्रिकीपद्धतीने शेती सुरु झाली. शेताचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांध गायब झाले. पर्यायाने त्यावरील वृक्षांची तोड झाली. पक्षांचा निवारा हिरावला गेला. शेतातील झाडे घरातील टेबल, खुर्ची, दरवाजा किंवा अन्य वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात येतील यासाठी वाढवित होता. मात्र लाकडाच्या तुलनेत प्लास्टिक व लोखंडी वस्तू स्वस्त मिळत असल्याने शेतकरी शेतात झाडे ठेवत नाही. शेत आणि वनसंपदेवर पूर्वी शेतकरी सर्वांचा अधिकार मानत होता. त्यामुळे आता शेतात वारंवार येणारी माकडे थांबविण्यासाठी तो वृक्षतोड करीत असल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता राजेंद्र स्वामी यांनी संमेलनात पक्ष्यासंबधी माहिती देत असताना त्यांना रोपांचे वाटप केले जावे. जेणेकरून वृक्ष वाढतील आणि पक्षी वाढतील. पक्षीसंवधर्न करण्यासाठी पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांची तोंडओळख व्हावी यासाठी तज्ज्ञांनी कार्यशाळा घेऊन माहितीचे आदानप्रदान करावे. त्या अनुशंगाने दुसरी साखळी तयार होईल.चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे चातक संस्थेचे अनिल महाजन यांनी सद्यस्थितीला ग्रामीण व शहरी भागातील ८० टक्के चिमण्या या नष्ट झाल्या आहेत. चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे त्यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती दिली.