शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पक्षीमित्रासोबतच निसर्गमित्र व्हा पक्षीमित्र संमेलनात सूर : रेस्क्यू हाऊसची गरज; खुल्या सत्रा दरम्यान व्यक्त केली भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:12 IST

पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.

जळगाव : उत्तर महाराष्ट्रस्तरीय पक्षीमित्र संमेलनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पक्ष्यांचा इतिहास व संवर्धन यासह विविध महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. पक्षी वाचविण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ पक्षीमित्र राहून चालणार नाही तर निसर्गमित्र व्हावे अशी अपेक्षा संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी आयोजित केलेल्या खुल्या सत्रादरम्यान उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.सातपुडा बचाव कृती समितीतर्फे वाघूर परिसरात दोन दिवसीय संमेलनात दुपारी १२ वाजता खुले सत्र घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष अभय उजागरे, संयोजक राजेंद्र नन्नवरे, डॉ.सुधाकर कुर्‍हाडे उपस्थित होते.माकडांचाउपद्रवथांबविण्यासाठीवृक्षतोडदत्तात्रय तावडे यांनी शेती शिवारातील पक्षांची स्थिती याबाबत आपले निरीक्षण नोंदविले. पूर्वी घनदाट जंगल होते. पाणी भरपूर होते. नंतर शेतीचा विकास झाला. विहिरीवर वीजपंप आले. पाण्याच्या प्रचंड उपशामुळे नदी व नाले आटले. त्यामुळे पक्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वी बैलाद्वारे शेती केली जात होती. त्यावेळी शेतात बांध होते. या बांधावर भरपूर झाडे असल्याने पक्ष्यांचा निवारा त्यावर होता. कालांतराने यांत्रिकीपद्धतीने शेती सुरु झाली. शेताचे क्षेत्र वाढविण्यासाठी बांध गायब झाले. पर्यायाने त्यावरील वृक्षांची तोड झाली. पक्षांचा निवारा हिरावला गेला. शेतातील झाडे घरातील टेबल, खुर्ची, दरवाजा किंवा अन्य वस्तू तयार करण्यासाठी उपयोगात येतील यासाठी वाढवित होता. मात्र लाकडाच्या तुलनेत प्लास्टिक व लोखंडी वस्तू स्वस्त मिळत असल्याने शेतकरी शेतात झाडे ठेवत नाही. शेत आणि वनसंपदेवर पूर्वी शेतकरी सर्वांचा अधिकार मानत होता. त्यामुळे आता शेतात वारंवार येणारी माकडे थांबविण्यासाठी तो वृक्षतोड करीत असल्याचे त्यांनी सांगितले.पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता राजेंद्र स्वामी यांनी संमेलनात पक्ष्यासंबधी माहिती देत असताना त्यांना रोपांचे वाटप केले जावे. जेणेकरून वृक्ष वाढतील आणि पक्षी वाढतील. पक्षीसंवधर्न करण्यासाठी पक्ष्यांसाठी रेस्क्यू होमची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांची तोंडओळख व्हावी यासाठी तज्ज्ञांनी कार्यशाळा घेऊन माहितीचे आदानप्रदान करावे. त्या अनुशंगाने दुसरी साखळी तयार होईल.चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे चातक संस्थेचे अनिल महाजन यांनी सद्यस्थितीला ग्रामीण व शहरी भागातील ८० टक्के चिमण्या या नष्ट झाल्या आहेत. चिमण्या वाचविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घरटे त्यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती दिली.