शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गरम्य हर्सिल ५५ वर्षांनी पर्यटकांसाठी पुन्हा झाले खुले

By admin | Updated: July 16, 2017 01:54 IST

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ८,६०० फूट उंचीवर वसलेल्या हर्सिल या गावाचे दरवाजे सरकारने ५५ वर्षांनंतर देशी-विदेशी पर्यटकांसाठी पुन्हा

डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ८,६०० फूट उंचीवर वसलेल्या हर्सिल या गावाचे दरवाजे सरकारने ५५ वर्षांनंतर देशी-विदेशी पर्यटकांसाठी पुन्हा सताड खुले केले आहेत.चीनच्या सीमेपासून अवघ्या १०० किमी अंतरावर असलेले हर्सिल हे गाव सामरिकदृष्ट्या मोक्याचे असून १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत सरकारने या गावात बाहेरच्या लोकांनी येण्यावर निर्बंध घातले होते. हर्सिलमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अनेक छावण्या असल्याने भारतीय आणि विदेशी पर्यटकांना ‘इनर लाइन परमिट’ घेऊनच तेथे प्रवेश मिळू शकत होता. परदेशी नागरिकांना तर तेथे रात्रीचा मुक्काम करण्यासही मज्जाव होता. पर्यटनास चालना मिळून स्थानिक लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी हर्सिल ‘परमिटमुक्त’ करण्याची मागणी उत्तरकाशीवासीयांनी गेली अनेक वर्षे नेटाने लावून धरली होती. ती मान्य करून अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने यंदाच्या १८ जून पासून हर्सिलमधील प्रवेश व मुक्कामासाठी कोणत्याही प्रकारचे ‘परमिट’ लागणार नाही, असे जाहीर केले आहे. पर्यटक व ट्रेकर्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे हर्सिलपासून ३० किमी अंतरावर असलले नेलाँग खोरेही खुले केले आहे. आतापर्यंत तेथे बाहेरच्या लोकांना जाण्यास मज्जाव होता. आता स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊन पर्यंटक तेथे जाऊ शकतील, अशी मुभा सरकारने दिली आहे. नेलाँग खोऱ्यापासून चीनची सीमा ६० किमी अंतरावर असून तेथेही भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या छावण्या आहेत. १९६२ च्या युद्धात नेलाँग खोरे व परिसरातील गावे खाली करून त्यांचे स्थलांतर अन्यत्र केले होते. उत्तराखंडचे चमोली अणि पिठोरगढ हे आणखी दोन जिल्हे चीनच्या सीमेला लागून आहेत व तेथे अजूनही ‘इनर परमिट’चे बंधन लागू आहे. (वृत्तसंस्था)१०० हिमशिखरे व हिरवेकंच जंगलहर्सिल हे त्याच नावाच्या खोऱ्यात वसलेले नितांतसुंदर व निसर्गरम्य असे गाव आहे.याच्या परिसरात हिमालयाची लहान-मोठी मिळून शंभर बर्फाच्छादित शिखरे आहेत. संपूर्ण खोऱ्यात नजर जाईल तिकडे देवदार वृक्षांचे घनदाट जंगल आहे व मानवी वस्त्यांच्या परिसरात सफरचंदांच्या हिरव्याकंच बागा आहेत.जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे हर्सिल चारधाम यात्रेपैकी गंगोत्री या तीर्थक्षेत्राला जाण्याच्या वाटेवर आहे. दरवर्षी गंगोत्रीला जाणारे सुमारे दोन लाख यात्रेकरू व पर्यटक हर्सिलवरून पुढे जात असतात.हर्सिल खुले झाल्याने तेथे राहूनही गंगोत्रीची यात्रा करणे शक्य होईल. शिवाय २,३९० चौ किमी क्षेत्रावर पसरलेल्या गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाची सफरही येथे मुक्काम करून करता येईल.दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गंगोत्री देवस्थानाचे दरवाजे बंद झाले की, सहा महिने पूजा-अर्चा व आरती जेथे स्थलांतरित होते ते मुखबा हे गावही हर्सिलपासून दोन किमी अंतरावर आहे.