शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

फिटनेसमुळेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनलो : कोहली

By admin | Updated: June 29, 2016 05:51 IST

शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले

नवी दिल्ली : २०१२ च्या आयपीएलनंतर फिटनेसबाबत मी गंभीर झालो. शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले.टीम इंडियात कोहली हा सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याने सहकाऱ्यांकडूनही अशीच अपेक्षा बाळगली आहे. स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष दिले याबद्दल कोहलीने अनेक किस्से सांगितले. वेस्ट इंडिज दौरा हे संघापुढील पहिले आव्हान असल्याचे सांगून कोहली पुढे म्हणाला, ‘२०१२ च्या आयपीएलपूर्वी मी फिटनेसबद्दल काळजी करीत नव्हतो. पण नंतर सकाळ ते रात्रीपर्यंत काय खायचे, किती व्यायाम करायचा आणि सरावात किती वेळ घालवायचा याबद्दल माहिती घेतली. फिटनेसच्या बळावर मैदानावर मी काहीही करू शकतो, असा विश्वास मिळाला आहे. २०१२ मध्ये माझ्यात आत्मविश्वास नव्हता. फिटनेसमुळे आत्मविश्वास कमावला.’कोहलीच्या फिटनेसचे कौतुक भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बासू यांनीदेखील केले. ते म्हणाले, ‘विराट जगातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट बनू इच्छितो. फिटनेस सुधारल्यामुळे फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही चपळता आली आहे.’ (वृत्तसंस्था)जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा आपण काहीही करू शकतो, याबद्दल आत्मविश्वास संचारतो. मी कधीही वेगवान क्षेत्ररक्षक बनू शकलो नसतो. क्षेत्ररक्षणाची प्रत्येक जागादेखील मला पसंत नव्हती. पण फिट व तंदुरुस्त होताच क्षेत्ररक्षणातील सर्व पूर्वग्रह दूर झाले. फिट राहणे व योग्य आहार घेणे हाच माझ्या दैनंदिनीचा भाग बनला आहे.- विराट कोहली, कर्णधार