शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

फिटनेसमुळेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनलो : कोहली

By admin | Updated: June 29, 2016 05:51 IST

शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले

नवी दिल्ली : २०१२ च्या आयपीएलनंतर फिटनेसबाबत मी गंभीर झालो. शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले.टीम इंडियात कोहली हा सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याने सहकाऱ्यांकडूनही अशीच अपेक्षा बाळगली आहे. स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष दिले याबद्दल कोहलीने अनेक किस्से सांगितले. वेस्ट इंडिज दौरा हे संघापुढील पहिले आव्हान असल्याचे सांगून कोहली पुढे म्हणाला, ‘२०१२ च्या आयपीएलपूर्वी मी फिटनेसबद्दल काळजी करीत नव्हतो. पण नंतर सकाळ ते रात्रीपर्यंत काय खायचे, किती व्यायाम करायचा आणि सरावात किती वेळ घालवायचा याबद्दल माहिती घेतली. फिटनेसच्या बळावर मैदानावर मी काहीही करू शकतो, असा विश्वास मिळाला आहे. २०१२ मध्ये माझ्यात आत्मविश्वास नव्हता. फिटनेसमुळे आत्मविश्वास कमावला.’कोहलीच्या फिटनेसचे कौतुक भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बासू यांनीदेखील केले. ते म्हणाले, ‘विराट जगातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट बनू इच्छितो. फिटनेस सुधारल्यामुळे फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही चपळता आली आहे.’ (वृत्तसंस्था)जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा आपण काहीही करू शकतो, याबद्दल आत्मविश्वास संचारतो. मी कधीही वेगवान क्षेत्ररक्षक बनू शकलो नसतो. क्षेत्ररक्षणाची प्रत्येक जागादेखील मला पसंत नव्हती. पण फिट व तंदुरुस्त होताच क्षेत्ररक्षणातील सर्व पूर्वग्रह दूर झाले. फिट राहणे व योग्य आहार घेणे हाच माझ्या दैनंदिनीचा भाग बनला आहे.- विराट कोहली, कर्णधार