शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

फिटनेसमुळेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनलो : कोहली

By admin | Updated: June 29, 2016 05:51 IST

शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले

नवी दिल्ली : २०१२ च्या आयपीएलनंतर फिटनेसबाबत मी गंभीर झालो. शारीरिक तंदुरुस्तीच्या बळावर मी केवळ उत्कृष्ट फलंदाजच नव्हे, तर क्षेत्ररक्षकही बनू शकलो, असे मत कसोटी कर्णधार विराट कोहली याने मंगळवारी व्यक्त केले.टीम इंडियात कोहली हा सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडू आहे. त्याने सहकाऱ्यांकडूनही अशीच अपेक्षा बाळगली आहे. स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीकडे कसे लक्ष दिले याबद्दल कोहलीने अनेक किस्से सांगितले. वेस्ट इंडिज दौरा हे संघापुढील पहिले आव्हान असल्याचे सांगून कोहली पुढे म्हणाला, ‘२०१२ च्या आयपीएलपूर्वी मी फिटनेसबद्दल काळजी करीत नव्हतो. पण नंतर सकाळ ते रात्रीपर्यंत काय खायचे, किती व्यायाम करायचा आणि सरावात किती वेळ घालवायचा याबद्दल माहिती घेतली. फिटनेसच्या बळावर मैदानावर मी काहीही करू शकतो, असा विश्वास मिळाला आहे. २०१२ मध्ये माझ्यात आत्मविश्वास नव्हता. फिटनेसमुळे आत्मविश्वास कमावला.’कोहलीच्या फिटनेसचे कौतुक भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बासू यांनीदेखील केले. ते म्हणाले, ‘विराट जगातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट बनू इच्छितो. फिटनेस सुधारल्यामुळे फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही चपळता आली आहे.’ (वृत्तसंस्था)जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा आपण काहीही करू शकतो, याबद्दल आत्मविश्वास संचारतो. मी कधीही वेगवान क्षेत्ररक्षक बनू शकलो नसतो. क्षेत्ररक्षणाची प्रत्येक जागादेखील मला पसंत नव्हती. पण फिट व तंदुरुस्त होताच क्षेत्ररक्षणातील सर्व पूर्वग्रह दूर झाले. फिट राहणे व योग्य आहार घेणे हाच माझ्या दैनंदिनीचा भाग बनला आहे.- विराट कोहली, कर्णधार