शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

न्यायालयीन लढाईला तयार!

By admin | Updated: October 26, 2016 05:18 IST

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलल्या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे, शापूरजी पालनजी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलल्या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे, शापूरजी पालनजी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, टाटा सन्सने मात्र, या प्रकरणी न्यायालयीन लढाईची पूर्ण तयारी केलेली दिसते. कंपनीच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले.शापूरजी पालनजी ही सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाची कंपनी असून, तिचे टाटा सन्समध्ये सर्वाधिक वैयक्तिक समभाग आहेत. मिस्त्री यांच्या वतीने शापूरजी पालनजी हकालपट्टीच्या विरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्याचा कंपनीकडून इन्कार करण्यात आला. मिस्त्री यांच्या हकालपट्टीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय कंपनीने घेतलेला नाही. असा निर्णय झालाच, तर तो अधिकृतरीत्या कंपनीच्या वतीने कळविला जाईल, असे शापूरजी पालनजीच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. टाटांनी मात्र, न्यायालयीन लढ्याची तयारी करत सर्वोच्च न्यायालयासह, मुंबई उच्च न्यायालय व राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात कॅव्हेट दाखल करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)टाटांनी का केली कॅव्हेट?मिस्त्री हे न्यायालयात गेलेच. टाटा सन्सच्या अनुपस्थितीत कोणत्याही प्रकारचा एकतर्फी निर्णय लागू नये, यासाठी ही खबरदारी टाटांच्या वतीने घेण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अंतरिम निर्णय देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घेण्यात यावे, अशी विनंती कॅव्हेटमध्ये करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.मिस्त्री यांच्या वतीने कॅव्हेट दाखलदरम्यान, टाटा सन्सचे पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या वतीनेही तीन कॅव्हेट दाखल करण्यात आली आहेत. प्रसिद्ध कायदे संस्था अमरचंद मंगलदासने मिस्त्री यांच्या वतीने रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले. याशिवाय सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. या कंपनीच्या वतीनेही रतन टाटा आणि टाटा सन्स यांच्या विरोधात स्वतंत्र कॅव्हेट दाखल करण्यात आले.