तीन तालुक्यांमध्ये बरसला पाऊस सोयाबीनचे नुकसान: कपाशी, तुरीसाठी उपयुक्त
By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST
अकोला: विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व पातूर या तीन तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून, कपाशी व तूर या पिकांसह रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
तीन तालुक्यांमध्ये बरसला पाऊस सोयाबीनचे नुकसान: कपाशी, तुरीसाठी उपयुक्त
अकोला: विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व पातूर या तीन तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून, कपाशी व तूर या पिकांसह रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.खरीप पिकांसह जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यांमध्ये वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच, शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अकोला शहरासह तालुक्यात आणि बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात अर्धा तास दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे कापणीला आलेल्या तसेच कापणी झाल्यानंतर तयार करण्यासाठी शेतात गंजी लावलेले सोयाबीन भिजले. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून, कपाशी व तूर या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. तसेच रब्बी हंगामात जमिनीतील ओलावा वाढविण्यासाठीदेखील हा पाऊस लाभदायी ठरला आहे. अकोला शहरासह तीन तालुक्यात अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तथापि, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.