शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

मुलांचे बालपण टिकविण्यासाठी साहित्याची आवड गरजेची संगीता बर्वे : १२ व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.

जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन प्रायोजित बाल साहित्याला वाहिलेल्या १२व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ बाल साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉ. संगीता बर्वे बोलत होत्या.
डॉ. भवरलाल जैन सभागृहातील महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर व्यासपीठावर (अखिल भारतीय जैन संघटना सभागृह) झालेल्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संघपती दलुभाऊ जैन, ११व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटक माया धुप्पड, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले (पुणे), एकनाथ आढाव (मुंबई), ज्येष्ठ साहित्यिक श.दि. वढोदकर, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक सतीश जैन यांनी केले.
डॉ. बर्वे पुढे म्हणाल्या मोठ्यांनी मुलांना शब्दांचा घास भरवावा म्हणजे बालकांच्या मेंदूचे भरण पोषण होईल. जगण्यासाठी साहित्य, कविता खूप उपयोगी ठरते. आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण हरवत जाते की काय अशी भीती व्यक्त करीत मुलांचे बालपण हे साहित्यामुळे जपता येते या बाबत स्वत:चे अनुभव डॉ. बर्वे यांनी सांगितले.
कवितेमुळे जीवनाची लय सापडते....
कविता वाचणार्‍या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यांना जीवनाची आंतरिक लय सापडलेली असते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. आजची मुल गप्पांऐवजी चॅटिंगमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे त्यांची लय हरविलेली दिसते, अशी खंतही बर्वे यांनी व्यक्त केली.
खान्देशात सकस बालसाहित्याची निर्मिती
उद््घाटक सुभाषचंद्र वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बालकवी, ग.दि. माळी, प्रज्ञा पुराणिक, के. नारखेडे यांच्यासह आजच्या अनेक साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य दिले व देत आहे, त्यामुळे खान्देशातून सकस बालसाहित्य निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी आजच्या बाल साहित्याबाबत विचार मांडले. या वेळी दलुभाऊ जैन, माया धुप्पड यांनीही विचार मांडले.