शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे बालपण टिकविण्यासाठी साहित्याची आवड गरजेची संगीता बर्वे : १२ व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.

जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन प्रायोजित बाल साहित्याला वाहिलेल्या १२व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ बाल साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉ. संगीता बर्वे बोलत होत्या.
डॉ. भवरलाल जैन सभागृहातील महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर व्यासपीठावर (अखिल भारतीय जैन संघटना सभागृह) झालेल्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संघपती दलुभाऊ जैन, ११व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटक माया धुप्पड, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले (पुणे), एकनाथ आढाव (मुंबई), ज्येष्ठ साहित्यिक श.दि. वढोदकर, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक सतीश जैन यांनी केले.
डॉ. बर्वे पुढे म्हणाल्या मोठ्यांनी मुलांना शब्दांचा घास भरवावा म्हणजे बालकांच्या मेंदूचे भरण पोषण होईल. जगण्यासाठी साहित्य, कविता खूप उपयोगी ठरते. आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण हरवत जाते की काय अशी भीती व्यक्त करीत मुलांचे बालपण हे साहित्यामुळे जपता येते या बाबत स्वत:चे अनुभव डॉ. बर्वे यांनी सांगितले.
कवितेमुळे जीवनाची लय सापडते....
कविता वाचणार्‍या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यांना जीवनाची आंतरिक लय सापडलेली असते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. आजची मुल गप्पांऐवजी चॅटिंगमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे त्यांची लय हरविलेली दिसते, अशी खंतही बर्वे यांनी व्यक्त केली.
खान्देशात सकस बालसाहित्याची निर्मिती
उद््घाटक सुभाषचंद्र वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बालकवी, ग.दि. माळी, प्रज्ञा पुराणिक, के. नारखेडे यांच्यासह आजच्या अनेक साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य दिले व देत आहे, त्यामुळे खान्देशातून सकस बालसाहित्य निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी आजच्या बाल साहित्याबाबत विचार मांडले. या वेळी दलुभाऊ जैन, माया धुप्पड यांनीही विचार मांडले.