शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

मुलांचे बालपण टिकविण्यासाठी साहित्याची आवड गरजेची संगीता बर्वे : १२ व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.

जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू दिले पाहिजे. कविता मुलांना जीवन जगविणे शिकविते त्यामुळे त्यांच्यात साहित्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन २६व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी संमेलनाध्यक्ष तथा ख्यातनाम बाल साहित्यिक डॉ.संगीता बर्वे (पुणे) यांनी केले.
सेवादास दलुभाऊ जैन प्रायोजित बाल साहित्याला वाहिलेल्या १२व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ बाल साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉ. संगीता बर्वे बोलत होत्या.
डॉ. भवरलाल जैन सभागृहातील महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर व्यासपीठावर (अखिल भारतीय जैन संघटना सभागृह) झालेल्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संघपती दलुभाऊ जैन, ११व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटक माया धुप्पड, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले (पुणे), एकनाथ आढाव (मुंबई), ज्येष्ठ साहित्यिक श.दि. वढोदकर, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक सतीश जैन यांनी केले.
डॉ. बर्वे पुढे म्हणाल्या मोठ्यांनी मुलांना शब्दांचा घास भरवावा म्हणजे बालकांच्या मेंदूचे भरण पोषण होईल. जगण्यासाठी साहित्य, कविता खूप उपयोगी ठरते. आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांचे बालपण हरवत जाते की काय अशी भीती व्यक्त करीत मुलांचे बालपण हे साहित्यामुळे जपता येते या बाबत स्वत:चे अनुभव डॉ. बर्वे यांनी सांगितले.
कवितेमुळे जीवनाची लय सापडते....
कविता वाचणार्‍या व्यक्ती संवेदनशील असतात. त्यांना जीवनाची आंतरिक लय सापडलेली असते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना साहित्याची गोडी लावणे गरजेचे आहे. आजची मुल गप्पांऐवजी चॅटिंगमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे त्यांची लय हरविलेली दिसते, अशी खंतही बर्वे यांनी व्यक्त केली.
खान्देशात सकस बालसाहित्याची निर्मिती
उद््घाटक सुभाषचंद्र वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बालकवी, ग.दि. माळी, प्रज्ञा पुराणिक, के. नारखेडे यांच्यासह आजच्या अनेक साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य दिले व देत आहे, त्यामुळे खान्देशातून सकस बालसाहित्य निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी आजच्या बाल साहित्याबाबत विचार मांडले. या वेळी दलुभाऊ जैन, माया धुप्पड यांनीही विचार मांडले.