शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

बारामुल्लात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद, अखेर चकमक थांबली

By admin | Updated: October 3, 2016 07:41 IST

सर्जिकल स्ट्राइकनंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरी करून हल्ला केला आहे.

ऑनलाइन लोकमत

जम्मू-काश्मीर, दि. 03 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याला (सर्जिकल स्ट्राईकला) काही दिवस उलटत नाहीत तोच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्करावर बारामुल्लामध्ये घुसखोरी करून हल्ला केला. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफलच्या 46 या कॅम्पमधून थेट सार्वजनिक पार्कमध्ये प्रवेश केला होता. दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेली जोरदार चकमक अखेर थांबली आहे. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त हाती येते आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यात तीन जवानही जखमी झाले असून, एक जवान शहीद झाला आहे. बारामुल्ला शहरापासून हा कॅम्प 54 किलोमीटर लांब आहे. येथे राष्ट्रीय रायफलच्या 46 बटालियनचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला अतिरेक्यांनी रात्री 10.30 वाजता लक्ष्य केले. दोन अतिरेकी या ठिकाणी आत्मघाती हल्ल्याच्या मनसुब्याने आले होते. मात्र, भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या दिशेने तुफान गोळीबार केला. शिवाय धडक कृती दलाला आणि पोलिसांचे विशेष पथकही पाचारण करण्यात आले. 

लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी लष्कराच्या जाबांझपोरा कॅम्पवर हल्ला केला आणि चकमक उशिरापर्यंत सुरू होती. कॅम्पजवळील काही घरांतूनही गोळीबाराचे आवाज येत होते. सर्जिकल स्ट्राईकनंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा तळांवर हल्ले होतील, असा इशारा गुप्तचारांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. तीनच दिवसांपूर्वी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सात दहशतवादी तळ नष्ट केले होते आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 15 दिवसांपूर्वी उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर अतिरेक्यांनी हल्ला केला होत. त्यात १९ जवान शहीद झाले होते. 

राजनाथ सिंह यांना दिली हल्ल्याची माहितीबारामुल्लामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना बीएसएफच्या डीजींकडून देण्यात आली आहे. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. अजित डोवल यांनी दहशतवादी हल्ल्याची इत्थंभूत माहिती घेऊन राजनाथ सिंह यांना दिली आहे. बारामुल्लामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी शीघ्र कृती दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. भारतीय लष्करानं सर्व बाजूंनी नाकाबंदी केली आहे. मुजफ्फराबादला जाणारा महामार्गही बंद करण्यात आला आहे. सेनेच्या तुकडीनं चौकशी अभियानालाही सुरुवात केली आहे.

 

 

या हल्ल्याचा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी टागोर यांच्या 'स्वातंत्र्या'बाबतच्या शब्दांची आठवण करून दिली आहे. 

 

युद्धबंदीचे उल्लंघनजम्मू जिल्ह्यातील पल्लनवाला क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानी सैन्याने रविवारी सायंकाळी पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय हद्दीत पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अधूनमधून गोळीबार सुरू होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.