शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

ATM चे रिकॅलिब्रेशन करणा-या कंपन्यांचे बँकांनी थकवले 110 कोटी

By admin | Updated: April 6, 2017 09:19 IST

एटीएम मशीन्सचे रिकॅलिब्रेशनचे सर्वात महत्वाचे काम करणा-या कॅश लॉजिस्टीक कंपन्यांना अजूनही त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर तात्काळ एटीएम मशीन्सचे रिकॅलिब्रेशनचे सर्वात महत्वाचे काम करणा-या कॅश लॉजिस्टीक कंपन्यांना अजूनही त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.  बँकांनी या कंपन्यांचे जवळपास 110 कोटी रुपये थकवल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा सरकारने चलनातून रद्द केल्यानंतर नव्या नोटांच्या आकारानुसार एटीएम मशीन्समध्ये काही बदल (रिकॅलिब्रेशन) करावे लागणार होते. 
 
नोटाबंदीच्या काळात एटीएम मशीन्सचे रिकॅलिब्रेशन झाल्यानंतरच लोकांना पैसे वेगाने मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली. तो पर्यंत नागरीकांना एटीएममधून 100 रुपयांची जुनी नोट मिळत होती. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीतील रिकॅलिब्रेशनच्या कामासाठी कॅश लॉजिस्टीक कंपन्यांनी जो दर आकारलाय त्यावर बहुतांश बँकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार 90 टक्के बँकांनी अद्यापपर्यंत रिकॅलिब्रेशनच्या कामाचे पैसे दिलेले नाहीत. एटीएममधून जुन्या नोटा बाहेर काढणे आणि रिकॅलिब्रेशनच्या कामाचा करारामध्ये समावेश नव्हता असे बँकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या काळात कॅश लॉजिस्टीक कंपन्यांनी जी सेवा दिली ते देशहिताचे कार्य असल्याने काही बँका पैसे द्यायला चालढकल करत आहेत तर, काही बँकांनी पेमेंटच्या मुद्यावर निर्णय संचालक मंडळावर सोडला आहे. 
 
रिकॅलिब्रेशनसाठी प्रत्येक एटीएमवर 5615 रुपये खर्च आला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँकांना प्रत्येक एटीएमसाठी लॉजिस्टीक कंपन्यांना 4 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. खासगी बँकांनी रिकॅलिब्रेशनच्या कामाचे पूर्ण पैसे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
कॅश लॉजिस्टीक इंडस्ट्री 30 हजार लोकांना रोजगार देते. यामध्ये एटीएम मशीन्सची देखभाल त्यामध्ये पैसे भरण्याचे काम असते. भारतातील 650 जिल्ह्यांमधील 2.2 लाख एटीएम मशीन्समध्ये 9 हजार कॅश व्हॅन्समधून रोकड पुरवली जाते. सध्या देशात सात कॅश लॉजिस्टीक कंपन्या आहेत.