शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

ATM चे रिकॅलिब्रेशन करणा-या कंपन्यांचे बँकांनी थकवले 110 कोटी

By admin | Updated: April 6, 2017 09:19 IST

एटीएम मशीन्सचे रिकॅलिब्रेशनचे सर्वात महत्वाचे काम करणा-या कॅश लॉजिस्टीक कंपन्यांना अजूनही त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर तात्काळ एटीएम मशीन्सचे रिकॅलिब्रेशनचे सर्वात महत्वाचे काम करणा-या कॅश लॉजिस्टीक कंपन्यांना अजूनही त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत.  बँकांनी या कंपन्यांचे जवळपास 110 कोटी रुपये थकवल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा सरकारने चलनातून रद्द केल्यानंतर नव्या नोटांच्या आकारानुसार एटीएम मशीन्समध्ये काही बदल (रिकॅलिब्रेशन) करावे लागणार होते. 
 
नोटाबंदीच्या काळात एटीएम मशीन्सचे रिकॅलिब्रेशन झाल्यानंतरच लोकांना पैसे वेगाने मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली. तो पर्यंत नागरीकांना एटीएममधून 100 रुपयांची जुनी नोट मिळत होती. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीतील रिकॅलिब्रेशनच्या कामासाठी कॅश लॉजिस्टीक कंपन्यांनी जो दर आकारलाय त्यावर बहुतांश बँकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार 90 टक्के बँकांनी अद्यापपर्यंत रिकॅलिब्रेशनच्या कामाचे पैसे दिलेले नाहीत. एटीएममधून जुन्या नोटा बाहेर काढणे आणि रिकॅलिब्रेशनच्या कामाचा करारामध्ये समावेश नव्हता असे बँकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या काळात कॅश लॉजिस्टीक कंपन्यांनी जी सेवा दिली ते देशहिताचे कार्य असल्याने काही बँका पैसे द्यायला चालढकल करत आहेत तर, काही बँकांनी पेमेंटच्या मुद्यावर निर्णय संचालक मंडळावर सोडला आहे. 
 
रिकॅलिब्रेशनसाठी प्रत्येक एटीएमवर 5615 रुपये खर्च आला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँकांना प्रत्येक एटीएमसाठी लॉजिस्टीक कंपन्यांना 4 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. खासगी बँकांनी रिकॅलिब्रेशनच्या कामाचे पूर्ण पैसे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
कॅश लॉजिस्टीक इंडस्ट्री 30 हजार लोकांना रोजगार देते. यामध्ये एटीएम मशीन्सची देखभाल त्यामध्ये पैसे भरण्याचे काम असते. भारतातील 650 जिल्ह्यांमधील 2.2 लाख एटीएम मशीन्समध्ये 9 हजार कॅश व्हॅन्समधून रोकड पुरवली जाते. सध्या देशात सात कॅश लॉजिस्टीक कंपन्या आहेत.