शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बँक व्यवहार ठप्प

By admin | Updated: September 3, 2015 02:00 IST

कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणा आणि सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणाच्या विरोधात देशभरातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसाच्या

नवी दिल्ली : कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणा आणि सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणाच्या विरोधात देशभरातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या एक दिवसाच्या राष्ट्रव्यापी संपामुळे पश्चिम बंगाल, त्रिपुरा, केरळ आणि कर्नाटकसह देशाच्या विविध भागांमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. या संपामुळे कोळसा उत्पादन, बँकांचे कामकाज आणि वाहतूक सेवा ठप्प पडली होती. पश्चिम बंगालमध्ये डावी आघाडी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हिंसक संघर्ष वगळता देशभरात संप शांततेत पार पडला.दररोज १.७ दशलक्ष टन कोळसा उत्पादन घेणाऱ्या कोल इंडियाला या संपाचा चांगलाच फटका बसला. देशभरातील चार लाख कोळसा कामगारांपैकी बहुतांश कामगार संपात सहभागी झाल्याने कोल इंडियातील कोळसा उत्पादन निम्म्यावर आले. वीजनिर्मिती आणि अन्य उत्पादन प्रकल्पांवरही या संपाचा परिणाम जाणवला. देशात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने संपाचा परिणाम होणार नाही आणि वीज उत्पादनही ठप्प पडणार नाही, असा दावा कोळसा व ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केला. कामगार संघटनांशी चर्चा करणारे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही संपाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे संगितले. आपल्या १२ सूत्री मागण्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या या संपात खासगी आणि सरकारी क्षेत्रातील सुमारे १५ कोटी कामगारांनी भाग घेतल्याचा दावा कामगार संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. भाजपाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघ आणि एनएफआयटीयू या दोन कामगार संघटनांनी या संपामधून आपले अंग काढून घेतले होते. प. बंगालच्या विविध भागांत 1,000 कामगारांना अटक केली. मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या बहरामपुरा आणि डोमकाल येथे डावी आघाडी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. राज्याच्या अन्य भागांतही असा संघर्ष उडाल्याचे वृत्त आहे. काही केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा देशाच्या बहुतांश भागात फारसा प्रभाव जाणवला नाही, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. १२ पैकी २ कामगार संघटना या संपात सामील झाल्या नाहीत, ३ संघटना तटस्थ राहिल्या, ७ संघटनांनीच संपात भाग घेतला. कामगारांना वाटाघाटी व चर्चेद्वारे आपल्या मागण्यांवर तोडगा हवा आहे. -श्रम मंत्रालयराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मंत्रालयातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आज सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम झाला.बँकिंग क्षेत्राचे 10लाख कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी संपावर गेले होते, असे अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एम. वेंकटाचलम यांनी सांगितले.राज्यभरात सरकारी कार्यालये ओसकामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या सार्वत्रिक संपाला मुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग घेतल्याने सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते. सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मात्र संपाचा तितकासा फटका बसल्याचे दिसले नाही. तसेच बँक कर्मचारीदेखील सहभागी झाल्याने सरासरी १० लाख कोटी रुपयांचे चेक रखडले. १३,००० सहकारी बँका सहभागी। २३ सरकारी बँका, १२ खासगी क्षेत्रातील बँका, ५२ प्रादेशिक ग्रामीण बँका व १३,००० सहकारी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे बँकांचे कामकाज जवळपास ठप्प पडले होते. भारतीय स्टेट बँक, आयओबी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी व अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेतला नाही.