शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

अभिव्यक्तीला पुन्हा दंश

By admin | Updated: May 30, 2015 02:12 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी मद्रासने (आयआयटी-एम) बहुतांश दलित विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संघटनेची मान्यता काढून घेतल्याचा वाद अवघ्या २४ तासांत चिघळला आहे.

वाद चिघळला : काँग्रेस आणि आपकडून निदर्शने, आयआयटीतील दलित संघटनेवर बंदीचेन्नई : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी मद्रासने (आयआयटी-एम) बहुतांश दलित विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एका संघटनेची मान्यता काढून घेतल्याचा वाद अवघ्या २४ तासांत चिघळला आहे. आंबेडकर पेरियार अभ्यास मंडळ (एपीएससी) ही विद्यार्थी संघटना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधक असल्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आल्याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकार सहिष्णू आहे काय, हा मुद्दा पुन्हा एकवार ऐरणीवर आला आहे. शिवाय यानिमित्ताने काँग्रेस आणि आपने केलेला आक्रमक दावा व त्यावर आयआयटी-एम आणि केंद्र सरकार करीत असलेले प्रतिदावे यामुळे या वादाला राजकीय रंग चढला आहे.‘आयआयटी-एम’मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गटाने हिंदीचा वापर आणि गोवंश हत्याबंदी यांसारख्या विषयांत सरकारच्या धोरणावर चर्चा सुरू केली. याबाबत सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह लावणारी जाहीर पत्रके या विद्यार्थ्यांनी वाटली. मुख्य म्हणजे त्यात त्यांनी आयआयटी -एम चे नाव वापरल्याने व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या संघटनेवर बंदी घालण्याची कारवाई केली. त्यातून वादाची ठिणगी पडली. कारवाईसाठी आयआयटी -एम ने संस्थेचे नाव वापरल्याचे कारण दिले असले, तरी केवळ मोदींच्या धोरणाविरोधातला आवाज दडपण्यासाठीच ही कारवाई झाल्याची चर्चा जोरात सुरु झाली. तशात विद्यार्थी संघटनांसाठी घालून देण्यात आलेले नियम सदर संघटनेने पाळलेले नाही. त्यामुळेच आयआयटीच्या अधिष्ठात्याने या संघटनेची मान्यता काढून घेतली, असे सांगत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आयआयटीच्या कृतीचे समर्थन केले. त्यानंतर इराणी यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एनएसयुआय या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या कारवाईमागे इराणी यांचे मंत्रालयच असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. तर आयआयटी मद्रासने घालून दिलेल्या नियमांचे सदर विद्यार्थी संघटनेने उल्लंघन केले असल्याचा दावा एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने केला आहे. आयआयटी मद्रास ही स्वायत्त संस्था असून स्वत:चे निर्णय स्वत: घेत असते. मानव संसाधन मंत्रालयातील दोष दाखविण्यातच काँग्रेसला स्वारस्य आहे, स्वायत्त शिक्षण संस्थेला स्वत:च्या कायद्यानुसार निर्णय घेण्याचा अधिकार असतो हे काँग्रेस समजून घेईल अशी मला खात्री आहे.- स्मृती इराणी, केंद्रीय मानवसंसाधन विकास मंत्री.दलित समुदायाला पंतप्रधानांबद्दल आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय?- आशुतोष, आपचे नेते.राहुल गांधी, मला फक्त वेळ आणि जागा सांगा, शिक्षणासह सरकारमधील कोणत्याही विषयावर चर्चा करायला मी तयार आहे.- स्मृती इराणीविद्यार्थ्यांच्या संघटनांना आपल्या कार्यक्रमांना पाठिंबा मिळविण्यासाठी अधिकृत परवानगीखेरीज आयआयटी मद्रासच्या नावाचा वापर करता येत नाही. या संघटनेने आपल्या बैठकी आयोजित करताना नियमांचे उल्लंघन केले आहे. - प्रा. राममूर्ती, आयआयटी बंदी घालून पुढे काय होणार? बोलण्याचे स्वातंत्र्य हा आमचा अधिकार आहे. मतभेद आणि चर्चा दडपण्याच्या कोणत्याही प्रयत्नाविरोधात आम्ही लढू.- राहुल गांधीदेशाचा लोकशाहीवादी आवाज दडपून टाकण्याचा हा राज्य आणि केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शैक्षणिक, बिगर शैक्षणिक किंवा विविध सरकारी विभागांमध्ये बाह्यगटांचा प्रभाव वाढल्याकडे राहुल गांधी यांनी वारंवार लक्ष वेधले आहे.- टॉम वडक्कन, प्रवक्ते