शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बांग्लादेशींनी धर्मांतर करावे, अन्यथा देश सोडावा - बजरंग दल

By admin | Updated: December 24, 2014 16:23 IST

बांग्लादेशींनी धर्मांतर करावे अन्यथा देश सोडावा असा धमकीवजा इशाराच मेरठमधील बजरंग दलाचे नेते बलराज डुंगर यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेरठ, दि. २४ - धर्मांतरावरुन निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे नसून आता बजरंग दलाने बांग्लादेशींना धर्मांतर करण्याचा इशारा दिला आहे. बांग्लादेशींनी धर्मांतर करावे अन्यथा देश सोडावा असा धमकीवजा इशाराच मेरठमधील बजरंग दलाचे नेते बलराज डुंगर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे बलराज डुंगर यांच्या विधानाशी विहिंप नेत्यांनीच असहमती दर्शवली आहे. 
धर्मांतरावरुन निर्माण झालेल्या वादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली व हिंदूत्ववादी संघटनांनी 'घर वापसी' या कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र मोदींनी नाराजी दर्शवूनही हिंदूत्ववादी नेत्यांनी वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच ठेवली आहे. मंगळवारी मेरठमधील बजंरग दलाचे नेते बलराज डुंगर म्हणाले, ४३ वर्षांपूर्वी अनेक बांग्लादेशी भारतात आले, बांग्लादेश युद्धानंतरही ते पुन्हा मायदेशी परतले नाहीत. या बांग्लादेशींनी देश सोडावा अन्यथा हिंदू धर्म स्वीकारावा, त्यामुळे  किमान हिंदू धर्मीयांची संख्या तरी वाढेल असे वादग्रस्त स्पष्टीकरणही त्यांनी दिले. विश्व हिंदू परिषदेचे सुदर्शनचक्र यांनी डुंगर यांच्या विधानाशी असहमती दिली. सरकारी आकडेवारीनुसार भारतात लाखो बांग्लादेशी राहत असून त्यांच्यामुळे भारतातील गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत, भारतविरोधी कृत्यांमध्ये त्यांचा समावेश असतो, त्यामुळे त्यांच्या धर्मांतराचा प्रश्नच निर्माण होत नाही. सर्व बांग्लादेशींनी भारत सोडावे हीच आमची भूमिका असल्याचे सुदर्शनचक्र यांनी सांगितले.