शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

भारतातर्फे बांगलादेशला वीजपुरवठा सुरू

By admin | Updated: March 24, 2016 00:43 IST

द्विपक्षीय संबंधातील एक नवा अध्याय सुरू करताना भारताने बुधवारी इंटरनेट बँडविड्थच्या मोबदल्यात बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. बँडविड्थमुळे ईशान्येकडील राज्यांना जोडण्यास मदत मिळेल

आगरतळा/नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधातील एक नवा अध्याय सुरू करताना भारताने बुधवारी इंटरनेट बँडविड्थच्या मोबदल्यात बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. बँडविड्थमुळे ईशान्येकडील राज्यांना जोडण्यास मदत मिळेल. हे ऐतिहासिक पाऊल, असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.भारत दहा गिगाबाईट्स प्रति सेकंद इंटरनेट बँडविड्थच्या बदल्यात बांगलादेशला १०० मेगावॅट विजेचा पुरवठा करेल. मोदी आणि बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या दोहोंची सुरुवात केली. भारतासोबत अंतराळ सहकार्य क्षेत्रात सामील होण्याचे बांगलादेशला आमंत्रण देताना मोदी म्हणाले, ‘माझ्या मते हे ऐतिहासिक पाऊल आहे. भारत बांगलादेशच्या विकासात त्या देशासोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत आणि आज एक नवा अध्याय प्रारंभ झाला आहे. एकमेकांवरील अवलंबित्वाच्या या युगात दोन्ही देश आपले द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करतील. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही देश विकासाच्या मार्गाला प्रोत्साहित करीत आहेत.’‘वीजपुरवठा आणि इंटरनेट बँडविड्थच्या माध्यमातून उभय देशांनी द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी आणली आहे,’ असे शेख हसिना म्हणाल्या. त्रिपुरामधून बांगलादेशला १०० मेगावॅट वीज पुरविण्यात येईल. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडने आगरतळाच्या सूर्यामणीनगर ते भारतीय सीमेपर्यंत ४०० केव्ही डीसी लाईन टाकलेली आहे, तर बांगलादेशच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेडने कोमिलापर्यंत लाईन टाकलेली आहे. यामुळे बांगलादेशमार्गे ईशान्येकडील राज्यांना ब्राडबँड संपर्क उपलब्ध करून देण्यासाठी एक नवा गेटवे उघडण्यात आला आहे.