शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बंगलोर- एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस रुळावरून घसरली

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

९ प्रवासी ठार, १६ गंभीर जखमी

९ प्रवासी ठार, १६ गंभीर जखमी
अनेकल(कर्नाटक)- कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर- एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात ९ प्रवासी ठार तर १६ जखमी झाले.
सकाळी ७.३० वाजता बेंगळुरूपासून ४५ किमी अंतरावरील अनेकल आणि होसुल दरम्यान रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. बंगलोर-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बेंगळुरूवरून रवाना झाली होती.
घटनास्थळी हजर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांना या अपघाताची माहिती देताना सांगितले की, मदत कार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला होता. मृतांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि नऊ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेनंतर लगेच केलेल्या टिष्ट्वटमध्ये रुळावर एक मोठा दगड पडला होता. इंटरसिटी एक्स्प्रेस त्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे.
आपण एका मोठ्या दगडाचा आवाज ऐकल्याचे गाडीचालकाने अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु असा कुठलाही दगड मिळालेला नाही,असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अपघातात जखमी १६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक लालरोखुमा पचाऊ यांनी दिली. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.
रेल्वे, पोलीस, अग्निशामक विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे संयुक्तपणे बचाव कार्य सुरूअसून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्रीय विधी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा तातडीने अपघातस्थळी पोहचले होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांच्या सांगण्यानुसार या अपघातात ५० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती त्यांना प्रशासनाकडून मिळाली आहे.


रेल्वेमंत्री अपघातस्थळी,चौकशीचे आदेश
दरम्यान अपघातस्थळी पोहोचलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याचे तसेच भविष्यात अशाप्रकारच्या अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५०,००० रुपये तर किरकोळ जखमींना २०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांचा दुखवटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. (वृत्तसंस्था)