शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

या भागात मुलांच्या स्कार्फ व हेल्मेट वापरावर बंदी

By admin | Updated: May 30, 2017 12:28 IST

आग्रा, मधुरा भागात झालेल्या हत्येच्या घटना लक्षात घेता तेथे 18 ते 30 वयोगटातील मुलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी टाकण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. 30- आग्रा, मधुरा भागात झालेल्या हत्येच्या घटना लक्षात घेता तेथे 18 ते 30 वयोगटातील मुलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. आग्रा भागाचे विभागीय आयुक्त के. राममोहन राव यांनी हा निर्णय घेतला आहे.  मथुऱा भागात एका सोनाराचं दुकानं लुटून चोरांनी दुकान मालकाची हत्या केली होती, त्याच पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  "रस्त्यावर कडक ऊन्ह असलं तरीही मुलांना कपड्याने चेहरा झाकता येणार नाही तसंच रस्त्यावरून हेल्मेट घालून मुलं चालू शकत नाही", असं के. राममोहन राव यांनी सांगितलं आहे. मुली आणि महिलांना यांना या नियमातून वगळण्यात आलं आहे. 
सार्वजनिक ठिकाणी चेहारा झाकून फिरणाऱ्या लोकांकडूनच गुन्हे घडतात, असंही विभागीया आयुक्तांचं म्हणणं आहे. "महिला आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी स्कार्फने चेहरा झाकण्यावर आमचा आक्षेप नाही, पण मुलांना चेहरा झाकता येणार नाही. बाहेर कितीही ऊन्ह असलं तरीही या नियमाचं पालन करावं लागेल, तसंच रस्त्यावरून चालताना मुलांना हेल्मेट घालून चालता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मथुरामध्ये आजवर झालेल्या प्रत्येक गुन्ह्यात हल्लेखोर आपला चेहरा झाकून होते. म्हणुन असा निर्णय घेतल्याचं, राममोहन राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला सांगितलं आहे. 
हा कोणत्याही प्रकारचा "तुघलकी फर्मान" नाही आहे, प्रत्येक भागातील अशा मुलांवर आमचं लक्ष असणार असल्याची माहिती राव यांनी दिली आहे. 
विशेष म्हणजे 18 ते 30 वयोगटातील मुलं गुन्ह्यांमध्ये सध्या आढळून  येत आहेत. चोरी करणं, चैन खेचणं असे गुन्हे ही मुलं आपला चेहरा झाकून करत आहेत. आग्रा-मधुरातील प्रत्येक भागात अशा मुलांवर अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे.  विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर सर्वसामान्यांची मतसुद्धा मागविण्यात आली आहेत. 
15 मे रोजी मथुरातील कोयलावाली गल्लीतील दोन सोनारांची हत्या करण्यात आली होती. चेहरा झाकलेल्या सहा हल्लेखोरांनी बळजबरीने दुकानात प्रवेश केला आणि या दोन्हीही सोनारांच्या दुकानातील तब्बल 4 कोटींचे दागिने घेऊन करून चोर पसार झाले होते.
या घटनेच्या अवघ्या चार दिवसानंतर फिरोजाबादमध्ये अपहरणाचा प्रकार घडला होता. 19 मे रोजी फिरोजाबादमधले काचेचे व्यवसायिक संजय मित्तल यांचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणाच्या सात तासानंतर फिरोजाबाद पोलिसांनी तुंडला बसई गावातून संजय मित्तल यांची सुटका केली होती.
आग्रा, मधुरा भागात घडणाऱ्या अशा गुन्ह्यांना चाप बसविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आहे.