शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

या भागात मुलांच्या स्कार्फ व हेल्मेट वापरावर बंदी

By admin | Updated: May 30, 2017 12:28 IST

आग्रा, मधुरा भागात झालेल्या हत्येच्या घटना लक्षात घेता तेथे 18 ते 30 वयोगटातील मुलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी टाकण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. 30- आग्रा, मधुरा भागात झालेल्या हत्येच्या घटना लक्षात घेता तेथे 18 ते 30 वयोगटातील मुलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. आग्रा भागाचे विभागीय आयुक्त के. राममोहन राव यांनी हा निर्णय घेतला आहे.  मथुऱा भागात एका सोनाराचं दुकानं लुटून चोरांनी दुकान मालकाची हत्या केली होती, त्याच पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  "रस्त्यावर कडक ऊन्ह असलं तरीही मुलांना कपड्याने चेहरा झाकता येणार नाही तसंच रस्त्यावरून हेल्मेट घालून मुलं चालू शकत नाही", असं के. राममोहन राव यांनी सांगितलं आहे. मुली आणि महिलांना यांना या नियमातून वगळण्यात आलं आहे. 
सार्वजनिक ठिकाणी चेहारा झाकून फिरणाऱ्या लोकांकडूनच गुन्हे घडतात, असंही विभागीया आयुक्तांचं म्हणणं आहे. "महिला आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी स्कार्फने चेहरा झाकण्यावर आमचा आक्षेप नाही, पण मुलांना चेहरा झाकता येणार नाही. बाहेर कितीही ऊन्ह असलं तरीही या नियमाचं पालन करावं लागेल, तसंच रस्त्यावरून चालताना मुलांना हेल्मेट घालून चालता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मथुरामध्ये आजवर झालेल्या प्रत्येक गुन्ह्यात हल्लेखोर आपला चेहरा झाकून होते. म्हणुन असा निर्णय घेतल्याचं, राममोहन राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला सांगितलं आहे. 
हा कोणत्याही प्रकारचा "तुघलकी फर्मान" नाही आहे, प्रत्येक भागातील अशा मुलांवर आमचं लक्ष असणार असल्याची माहिती राव यांनी दिली आहे. 
विशेष म्हणजे 18 ते 30 वयोगटातील मुलं गुन्ह्यांमध्ये सध्या आढळून  येत आहेत. चोरी करणं, चैन खेचणं असे गुन्हे ही मुलं आपला चेहरा झाकून करत आहेत. आग्रा-मधुरातील प्रत्येक भागात अशा मुलांवर अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे.  विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर सर्वसामान्यांची मतसुद्धा मागविण्यात आली आहेत. 
15 मे रोजी मथुरातील कोयलावाली गल्लीतील दोन सोनारांची हत्या करण्यात आली होती. चेहरा झाकलेल्या सहा हल्लेखोरांनी बळजबरीने दुकानात प्रवेश केला आणि या दोन्हीही सोनारांच्या दुकानातील तब्बल 4 कोटींचे दागिने घेऊन करून चोर पसार झाले होते.
या घटनेच्या अवघ्या चार दिवसानंतर फिरोजाबादमध्ये अपहरणाचा प्रकार घडला होता. 19 मे रोजी फिरोजाबादमधले काचेचे व्यवसायिक संजय मित्तल यांचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणाच्या सात तासानंतर फिरोजाबाद पोलिसांनी तुंडला बसई गावातून संजय मित्तल यांची सुटका केली होती.
आग्रा, मधुरा भागात घडणाऱ्या अशा गुन्ह्यांना चाप बसविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आहे.