शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची ओळख नसलेल्या व्यक्तीला तेरा दिवसांत आमदार केले बाळराजे पाटील : येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा असेल

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

सोलापूर :

सोलापूर :
ज्याला तालुक्याची ओळखसुद्धा नाही अशा माणसाला माजी आमदार राजन पाटील व मनोहर डोंगरे यांनी अवघ्या 13 दिवसांत आमदार केले. तीच व्यक्ती मोहोळ तालुक्यातील मालकशाही व भाऊगिरी संपवण्याची भाषा करीत आहे. त्याला भविष्यात जनता मुळासह उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्यापासून त्यांच्या तिसर्‍या पिढीपर्यंत अनगरच्या पाटील परिवाराने मोहोळ तालुक्यातील जनतेशी बांधीलकी जपली आहे. तालुकाच आपले कुटुंब समजून केलेल्या कार्यामुळे जनता माजी आमदार राजन पाटील यांना आदराने मालक म्हणते. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून उभारी देताना अनेक कुटुंबे उभी केली. कार्यकर्त्यांची किंमत पैशात मोजणार्‍यांना निष्ठेची किंमत काय कळणार, असा टोला आमदार रमेश कदम यांना लगावत बाळराजे पाटील म्हणाले की, येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मालकगिरी संपवण्याच्या वल्गना करणार्‍यांना जनता आपला हिसका दाखवेल. माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यात 15 वर्षे आमदार म्हणून काम केले. गावागावात, वाड्यावस्त्यावर निष्ठावंत कार्यकर्ते जोडले. कार्यकर्त्यांच्या अडचणीला धाऊन जात त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध निर्माण केले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आरक्षित मतदारसंघ असतानाही रमेश कदम यांना विधानसभेत पाठविले. ज्या व्यक्तीचे तालुक्यातील जनतेने कधीही तोंड पाहिले नाही अशा व्यक्तीला आमदार केले. मात्र निवडून आल्यानंतर मालकशाही आणि भाऊगिरी संपविण्याच्या गोष्टी करून कृतघ्नतेचा कळस केला. येणार्‍या ग्रामपंचायतीवरही आमचाच झेंडा राहणार आहे असेही यावेळी बाळराजे पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष विक्रांत दळवी, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, विधानसभा अध्यक्ष शामराव पाटील, युवक अध्यक्ष विधानसभा शशिकांत पाटील, भारत सुतकर, अभिजित गायकवाड, शहाजहान शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चौकट..
पैशाच्या जोरावर राजकारण..
गैर मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर जर कुणी कार्यकर्ते विकत घेऊन राजकारणावर वर्चस्व वाढविण्याची इच्छा व्यक्त करीत असेल तर ती कधीही पूर्ण होणार नाही. एखाद दुसरा अपवाद वगळता आजवरच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.