शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

जनतेची ओळख नसलेल्या व्यक्तीला तेरा दिवसांत आमदार केले बाळराजे पाटील : येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा असेल

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

सोलापूर :

सोलापूर :
ज्याला तालुक्याची ओळखसुद्धा नाही अशा माणसाला माजी आमदार राजन पाटील व मनोहर डोंगरे यांनी अवघ्या 13 दिवसांत आमदार केले. तीच व्यक्ती मोहोळ तालुक्यातील मालकशाही व भाऊगिरी संपवण्याची भाषा करीत आहे. त्याला भविष्यात जनता मुळासह उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्यापासून त्यांच्या तिसर्‍या पिढीपर्यंत अनगरच्या पाटील परिवाराने मोहोळ तालुक्यातील जनतेशी बांधीलकी जपली आहे. तालुकाच आपले कुटुंब समजून केलेल्या कार्यामुळे जनता माजी आमदार राजन पाटील यांना आदराने मालक म्हणते. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून उभारी देताना अनेक कुटुंबे उभी केली. कार्यकर्त्यांची किंमत पैशात मोजणार्‍यांना निष्ठेची किंमत काय कळणार, असा टोला आमदार रमेश कदम यांना लगावत बाळराजे पाटील म्हणाले की, येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मालकगिरी संपवण्याच्या वल्गना करणार्‍यांना जनता आपला हिसका दाखवेल. माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यात 15 वर्षे आमदार म्हणून काम केले. गावागावात, वाड्यावस्त्यावर निष्ठावंत कार्यकर्ते जोडले. कार्यकर्त्यांच्या अडचणीला धाऊन जात त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध निर्माण केले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आरक्षित मतदारसंघ असतानाही रमेश कदम यांना विधानसभेत पाठविले. ज्या व्यक्तीचे तालुक्यातील जनतेने कधीही तोंड पाहिले नाही अशा व्यक्तीला आमदार केले. मात्र निवडून आल्यानंतर मालकशाही आणि भाऊगिरी संपविण्याच्या गोष्टी करून कृतघ्नतेचा कळस केला. येणार्‍या ग्रामपंचायतीवरही आमचाच झेंडा राहणार आहे असेही यावेळी बाळराजे पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष विक्रांत दळवी, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, विधानसभा अध्यक्ष शामराव पाटील, युवक अध्यक्ष विधानसभा शशिकांत पाटील, भारत सुतकर, अभिजित गायकवाड, शहाजहान शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चौकट..
पैशाच्या जोरावर राजकारण..
गैर मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर जर कुणी कार्यकर्ते विकत घेऊन राजकारणावर वर्चस्व वाढविण्याची इच्छा व्यक्त करीत असेल तर ती कधीही पूर्ण होणार नाही. एखाद दुसरा अपवाद वगळता आजवरच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.