शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:42 IST

बिहारमधील राजकीय घडामोडींना आता वेगळे ट्विस्ट आले आहे. बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला.

ऑनलाइन लोकमतपाटणा, दि. 26 - बिहारमधील राजकीय घडामोडींना आता वेगळे ट्विस्ट आले आहे.  बिहारचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर काही तासानंतर राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्या नाकाला दुखापत झाल्यामुळे उपचारांसाठी त्यांना पाटणा येथील आयजीएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयातच रात्रभर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांना काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.  

दरम्यान, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाने त्यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, मुख्यमंत्री निवासात भाजपा आणि जदयूच्या आमदारांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, नितीश कुमार सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याची माहिती बिहार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी दिली आहे. दुसरीकडे, मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार उद्या संध्याकाळी 5 वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा सोपवला. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या मुद्यावरुन नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंब्याची ऑफर दिली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचारापेक्षा अत्याचाराचा आरोप आहे.