शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

बदायूतील 'त्या' बहिणींची हत्या नव्हे आत्महत्याच - सीबीआय

By admin | Updated: November 27, 2014 12:21 IST

उत्तरप्रदेशमधील बदायू येथील दोघा बहिणींच्या हत्याकांडाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. या दोघी बहिणींची हत्या झाली नसून आत्महत्या केली होती असा दावा सीबीआयने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - उत्तरप्रदेशमधील बदायू येथील दोघा बहिणींच्या हत्याकांडाने आता नाट्यमय वळण घेतले आहे.  या दोघी बहिणींची हत्या झाली नसून आत्महत्या केली होती असा दावा सीबीआयने केला आहे. तसेच त्यांच्यावर बलात्कारही झाला नव्हता अशी माहितीही तपासातून समोर आली आहे. 

उत्तरप्रदेशमधील बदायू जिल्ह्यात २७ मे रोजी दोघा बहिणींचा मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळला होता. या दोघींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप मुलींच्या कुटुंबियांनी केला होता. या आधारे उत्तरप्रदेश पोलिसांनी पप्पू यादव, अवधेश यादव यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. मृत मुली या अवघ्या १४ आणि १५ वर्षाच्या असल्याने देशभरात या अमानूष हत्याकांडामुळे खळबळ माजली होती. समाजसेवी संघटनांनी रस्त्यावर उतरुन या घटनेचा तीव्र निषेध केला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने या कथीत हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आला होता. 
जूनमध्ये सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला व तब्बल पाच महिन्यांनी सीबीआयला या प्रकरणाचे गुढ उकलण्यात यश आले आहे. या दोघा बहिणींची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती सीबीआयचे प्रमुख रणजित सिन्हा यांनी दिली. या दोघींची हत्या करताना बघणारा एकही साक्षीदार सीबीआयला मिळू शकलेला  नाही. या दोघींनी फरफटत नेताना बघितल्याचे ज्याने म्हटले होते त्याची साक्षही खोटीच होती असे समोर आले आहे. या दोघींवर लैंगिक अत्याचार झालाच नव्हता असे हैद्राबादमधील वैद्यकीय प्रयोगशाळेने केलेल्या चाचणीत निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती सीबीआय उद्या कोर्टासमोर सादर करेल अशी शक्यता आहे.  या दोघींची गावातील एका तरुणाशी मैत्री होती व याला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता.