शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ

By admin | Updated: June 20, 2014 18:03 IST

रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी घसघशीत वाढ केली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २०- रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४.२ टक्के तर मालवाहतुकीत सुमारे ६.५ टक्क्यांनी वाढ केली असून मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

रेल्वे भाडेवाढीचा निर्णय यूपीए सरकारच्या कालावधीतच घेण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. जुलैमध्ये रेल्वेचे बजेट सादर होणार असून त्यापूर्वीच भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. जर प्रवाशांनी या भाडेवाढीपूर्वी तिकीट बूक केले असेल तर त्यांना प्रवासादरम्यान गाडीत टीसीला वाढीव भाड्याचे पैसे द्यावे लागणार आहे. रेल्वेची वित्तीय तुट भरुन काढण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने रेल्वेचे अनेक प्रकल्प बारळले असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही टीका केली आहे. आम आदमीच्या विरोधात काम करणारे सरकार असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडू औषध देण्याची वेळ आली आहे असे विधान केले आहे. याद्वारे मोदींनी अर्थव्यवस्थेच्या हितासाठी काही कटू निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.