शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मागासवर्गीय दिव्यांगांना परीक्षेत इतरांहून वाढीव संधी नाहीत

By admin | Updated: January 26, 2017 01:34 IST

दिव्यांग असलेली व्यक्ती आपण‘ओबीसी’ओबीसी असल्याच्या आधारावर सर्वसाधारण प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींहून अधिक सवलती मागू शकत नाही

नवी दिल्ली : दिव्यांग असलेली व्यक्ती आपण‘ओबीसी’ओबीसी असल्याच्या आधारावर सर्वसाधारण प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींहून अधिक सवलती मागू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये ‘ओबीसी’ दिव्यांग उमेदवारांना परीक्षा देण्याच्या १० नव्हे तर इतर दिव्यांगांप्रमाणे सातच संधी मिळतील, असे जाहीर केले आहे.या परीक्षा देण्यासाठी कमाल चार प्रयत्नांची मर्यादा लागू होती. सन २००७ मध्ये केंद्र सरकारने दिव्यांग उमेदवारांना सवलत देत कमाल प्रयत्नांची संख्या सात अशी केली. काही ‘ओबीसी’उमेदवारांनी याविरुद्ध दिल्ली व मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या उच्च न्यायालयांनी सरकारचा निर्णय पक्षपाती ठरवून ‘ओबीसी’ दिव्यांग उमेदवारांना परीक्षेत कमाल १० संधी द्याव्यात, असे निकाल दिले. केंद्र सरकारने याविरुद्ध केलेली अपिले प्रलंबित असताना ऋषभ चौधरी याने या मुद्द्यावर थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या तिन्ही प्रकरणांंचा निकाल देताना न्या. रंजन गोगोई व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)