शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

By बाळकृष्ण परब | Updated: September 30, 2020 15:44 IST

Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

ठळक मुद्देहा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे१९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहेकलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे

लखनौ - बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्यावर अखेर आज लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या निकालानंतर भाजपाच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी बाबरी मशीदच्या बाजूने असलेल्या मंडळींनी वरच्या न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे प्रसिद्ध वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितले आहे.लखनौमधील सीबीआय न्यायालयाने आज निकाल सुनावताना ३२ आरोपींना मुक्त केल्यानंतर निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, हा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे. १९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांतील लोकांनी या लोकांचे नाव घेतले होते. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींसारखे अन्य नेते एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो अशा घोषणा द्यायचे.कलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे. आम्ही आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहोत, अशी माहिती जिलानी यांनी दिली.बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी  माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे

टॅग्स :babri masjid verdictबाबरी मशीद निकालbabri masjidबाबरी मस्जिदAyodhyaअयोध्याCourtन्यायालय