शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Babri Masjid Demolition Verdict : जफरयाब जिलानी म्हणाले, निकाल अमान्य, उच्च न्यायालयात आव्हान देणार

By बाळकृष्ण परब | Updated: September 30, 2020 15:44 IST

Babri Masjid Demolition Verdict : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी निकाल देताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

ठळक मुद्देहा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे१९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहेकलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे

लखनौ - बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्यावर अखेर आज लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. यावेळी न्यायालयाने ही मशीद पूर्वनियोजितरीत्या पाडले गेली नसून जे काही घडले अचानच घडल्याचे अधोरेखित करत या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, या निकालानंतर भाजपाच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी बाबरी मशीदच्या बाजूने असलेल्या मंडळींनी वरच्या न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे प्रसिद्ध वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितले आहे.लखनौमधील सीबीआय न्यायालयाने आज निकाल सुनावताना ३२ आरोपींना मुक्त केल्यानंतर निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, हा निकाल कायदा आणि पुराव्यांविरोधात आहे. १९९४ पासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गुन्हा घडल्याचे सांगत आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांतील लोकांनी या लोकांचे नाव घेतले होते. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींसारखे अन्य नेते एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो अशा घोषणा द्यायचे.कलम १९८ आणि १९७ अन्वये हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत या सर्वांना मुक्त करणे एकदम चुकीचे आहे. आम्ही आता या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार आहोत, अशी माहिती जिलानी यांनी दिली.बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची आज न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याप्रकरणी  माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपा नेते विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 जण आरोपी होते. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले होते. दरम्यान, बाबरी मशीद पतन प्रकरणी लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे

टॅग्स :babri masjid verdictबाबरी मशीद निकालbabri masjidबाबरी मस्जिदAyodhyaअयोध्याCourtन्यायालय