शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांना दलितांपुरतं मर्यादित ठेवू नये - नरेंद्र मोदी

By admin | Updated: March 21, 2016 13:23 IST

आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २१ - 'आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नये', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचा शीलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. 'बाबासाहेब आपल्याला 1956मध्ये सोडून गेले, आज 60 वर्षानंतर आपण स्मारक बांधायला सुरुवात करत आहोत', अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
 
'बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक अमानुष घटनेविरोधात आवाज उठवणारे महापुरुष होते. ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणासाठी काम केलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सामाजिक एकीकरणासाठी काम केलं. जेव्हा महिलांच्या हक्कांचा विषय आला तेव्हा जर महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळाचा भाग राहू शकत नाही असं सांगत बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते मात्र इतिहासातील ही गोष्ट लोक विसरले आहेत किंवा बदलली गेली आहे', असं सांगत महिला समान हक्कांचा विषय मोदींनी यावेळी मांडला. 
 
बाबासाहेब जर सरकारमध्ये राहिले असते तर मी जे आज करतो आहे ते त्यांनी 60 वर्षापुर्वीच केलं असतं. काही लोकांना आम्ही अजिबात आवडत नाही, आम्हाला पाहायला पण आवडत नाही, त्यांना आजार होतो, आणि आजारात माणूस काहीही बोलतो, मनावरचा ताबा सुटतो असं म्हणत मोदींनी यावेळी विरोधकांवर टीका केली. 
'वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा काही लोक आता आरक्षण जाईल असं बोलायला लागले, मात्र असं काहीच झालं नाही. दलित, आदिवसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागलेला नाही, मात्र जिथे आमची सत्ता आहे तिथे अजूनही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. दलित, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांचा आरक्षण अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही', असं सांगत मोदींनी आरक्षणाबाबतची सरकारची भुमिका स्पष्ट केली. 'बाबासाहेबांच स्वप्न पुर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. कदाचित हे माझ्या नशिबात होतं'. 26 अलीपूर रोडवर हे स्मारक बांधण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम विभाग हे स्मारक उभारणार आहे. या स्मारकाचं उद्धाटन 14 एप्रिल 2018 रोजी करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.