शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बाबराने मंदिर पाडले नाही, तेथे मशिदही बांधली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:14 IST

अयोध्या वाद : हिंदू पक्षकाराचा सुप्रीम कोर्टात दावा

नवी दिल्ली : मुघल बादशहा बाबर अयोध्येत कधी आलाच नव्हता व सन १५२८ मध्ये तेथील वादग्रस्त जागेवरील मंदिर पाडून तेथे मशिद बांधण्याचा आदेशही त्याने कधी दिला नव्हता, असा दावा एका हिंदू पक्षकाराने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमिनीची तीन समान भागांत वाटणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेल्या अपिलांवरील दैनंदिन सुनावणी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विशेष घटनापीठापुढे १४ व्या दिवशीही अपूर्ण राहिली. बुधवारी ‘अखिल भारतीय श्री राम जन्मभूमी पुनरुद्धार समिती’ या हिंदू पक्षकारातर्फे ज्येष्ठ वकील पी. एन. मिश्रा यांचा युक्तिवाद झाला.‘तुझुक-ई-बाबरी’ (बाबरनामा), ‘हुमायूंनामा’, ‘अकबरनामा’ आणि ‘तुझुक-ई-जहांगिरी’ या मुघल बादशहांच्या तत्कालिन चरित्रात्मक ग्रथांचे संदर्भ देत अ‍ॅड. मिश्रा म्हणाले की, खास करून ‘बाबरनामा’मध्ये बाबराचा सेनापती मिर बकी याने अयोध्येतील मंदिर पाडल्याचा किंवा तेथे मशिद बांधल्याचा कुठेही उल्लेख नाही. ते म्हणाले की, बाबर कधी अयोध्येत आलाच नव्हता त्यामुळे सन १५२८ मध्ये त्याने तेथील मशिद पाडण्याचा व मशिद बांधण्याचा आदेश देण्याचा प्रश्नच येत नाही. एवढेच कशाला बाबराचा मिर बकी नावाचा कोणी सेनापती असल्याचाही उल्लेख आढळत नाही.

हे सर्व संदर्भ तुम्ही कशासाठी देत आहात, या न्यायमूर्तींच्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅड. मिश्रा म्हणाले की, आमचे मंदिर हे प्रत्यक्षात मशिद असल्याचा मुस्लिम पक्षकारांचा दावा आहे. प्रतिवादी या नात्याने तो खोडून काढण्यासाठी मला हे दाखवावे लागत आहे.त्यांच्या या कथित मशिदीला बाबरी मशिद म्हणायचे असेल तर ती बाबराने बांधली किंवा त्याच्या आदेशावरून बांधली गेली हे सिद्ध व्हायला हवे. एखादी व्यक्ती खोटे बोलू शकते, पण इतिहासातील परिस्थितीजन्य संदर्भ असत्य असू शकत नाहीत.

अ‍ॅड. मिश्रा पुढे असेही म्हणाले की, या उलट अबुल फजलने सन १५७६ मध्ये लिहिलेले ‘ऐन-ई-अकबरी’ पाहा. त्यात फजल अयोध्येतील ‘रामकोट’चा उल्लेख करतो व ती जागा श्री रामाचे जन्मस्थान असल्याची हिंदूंची श्रद्धा असल्याचेही लिहितो. या पुस्तकात याच परिसरातील तीन थडग्यांचे तपशीलवार वर्णन आहे, पण तेथे मशिद असल्याचा पुसटसाही उल्लेख नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर