शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

संधिवातावर आयुर्वेदाची मात्रा गुणकारी

By admin | Updated: April 5, 2015 01:22 IST

सांधेदुखी-संधिवातावर आयुर्वेदिक औषधोपचार अत्यंत गुणकारी असल्याच्या निष्कर्षावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एआयआयएमएस) परीक्षणाअंती शिक्कामोर्तब केले आहे.

नवी दिल्ली : आयुर्वेद जगातील प्राचीन वैद्यकीय उपचार पद्धती असून सांधेदुखी-संधिवातावर आयुर्वेदिक औषधोपचार अत्यंत गुणकारी असल्याच्या निष्कर्षावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एआयआयएमएस) परीक्षणाअंती शिक्कामोर्तब केले आहे.वाढत्या वयात सांधेदुखीमुळे अनेकांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. आयुर्वेदात सांगितलेले औषधोपचार सांधेदुखी-संधिवातावर खरेच परिणामकारक आहेत का? यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने सांधेदुखीने त्रस्त असलेल्या १२५ रुग्णांचे शास्त्रोक्त परीक्षण केले असता अश्वगंधा चूर्ण, सिद्ध मकरध्वजच्या सेवनाने वेदना आणि सूज यापासून दिलासा मिळतो. तसेच सांध्यांची हालचालही सहजगत्या होत असल्याचे आढळून आले आहे. वनस्पतीजन्य पदार्थ आणि खनिजद्रव्याच्या मिश्रणातून अश्वगंधा चूर्ण आणि सिद्ध मकरध्वज हे औषधी घटक तयार केले जातात. पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा पद्धतीतील उपचारांना प्रमाणित करण्याच्या एक भाग म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने हा संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. अपस्मार (इलिप्सी), अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व हृदयविकारावरील पर्यायी उपचारांना प्रमाणित करण्यासाठीही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अभ्यास करीत आहे, असे एम्सच्या औषधीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाय. के. गुप्ता यांनी सांगितले. दुष्परिणाम होत नाहीत, तसेच आर्थिकदृष्ट्याही परवडणारी औषधे असल्याने अनेक जण पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा पद्धतीत स्वारस्य दाखवीत आहेत. याशिवाय केंद्र सरकारही यासाठी प्रोत्साहन देत आहे. हळद, शंखपुष्पी, अर्जुनारिष्टच्या गुणकारी तत्त्वांचा अभ्यास करून त्यांच्या औषधीमूल्यांना प्रमाणित करण्याबाबतही एम्स संशोधन करीत आहे. वेदनाशामक, तणाव कमी करणारे आणि प्रतिकारशक्तीला पूरक असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शारीरिक हालचाली सुधारण्यास अश्वगंधा चूर्ण गुणकारी असल्याचेही एम्सच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.